मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना, ठाणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून, दोन प्रकरणात ही लूक नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे. कारण या लूक आऊट नोटीशीमुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता सांगितली जात आहे. तक्रारारदार शरद अग्रवाल आणि सोनू जालान प्रकरणी परमबीर यांच्यासह ३० पेक्षा जास्त आरोपींना ही नोटीस जारी केल्याचंही समोर येत आहे.
Extortion case | Look Out Circular issued against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh (in file photo): Thane Police Commissioner Jai Jeet Singh to ANI pic.twitter.com/BUT4GimcXA
— ANI (@ANI) August 13, 2021
तसेच, परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखीन एक एफआयआर नोंदवण्यात आला असून, केतन मनसुखलाल तन्ना या व्यावसायिकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आहे. कोपरी आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यात परमबीर सिंग यांच्यावर खंडणी आणि इतर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून ही लुक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे.
“संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या समोरच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसून येत असून, आत्तापर्यंत त्यांच्याविरोधात खंडणी आणि फसवणुकीचे असे ३ गुन्हे दाखल झाले आहेत. यातच आता त्यांच्या संदर्भात अजून एका धक्कादायक खुलासा तक्रारदार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केला असून, “महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या कटाचा परमबीरसिंग एक भाग होते,” असा दावा त्यांनी केला आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. बदली झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुखांवर हे आरोप केले. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेमार्फत देशमुखांनी १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिल्याचे या पत्रात म्हटलं आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून ईडीकडूनही मनी लाँर्डिंगच्या आरोपाखाली देशमुख यांची चौकशी सुरू आहे
Read Also :
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडू; उदय सामंत यांचा इशारा
- शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
- औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळ केलं; भाजप आमदाराचा घणाघात
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट