मुंबई : युती सरकारच्या काळात सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, चिक्की घोटाळा प्रकरण बरेच गाजले होते. आत्ता हे प्रकरण पुन्हा उलगडून सांगण्याचे कारण म्हणजे, तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळातील असलेल्या या कथित चिक्की वाटप घोटाळ्याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून, मुंबई उच्च न्यायालायने, अद्यापही खासगी पुरवठादारांवर एफआयआर दाखल का करण्यात आलेला नाही?” असा थेट सवाल राज्य सरकारला विचारला आहे.
“संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’
एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत, नगर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना दिली जाणारी चिक्की, निकृष्ट दर्जाची असल्याचे उघड झाल्याने, नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे तातडीने आदेश दिले होते. त्यानंतर खळबळजनक अशी माहिती या तपासात उजेडात आली होती, ती म्हणजे महिला व बालकल्याण खात्याने एकाच दिवसात चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इ. तब्बल २०६ कोटींच्या वस्तूंच्या खरेदीसाठी एकाच आदेश काढल्याचा, तसेच यात नियमभंग केल्याचा गंभीर आरोप झाला होता.
“महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” राज ठाकरेंचे मोठे विधान
दुसरीकडे, तत्कालीन महिला व बालकल्याण विकास खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व आरोपांना उत्तर देताना, हे आरोप खोटे आणि राजकीय असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच, कोणत्याही नियमांचे उल्लंघन यात झाले नाही, असे सांगितले होते. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं असून, आता उच्च न्यायालयाने यावर राज्य सरकारला सवाल केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचा हातात-हात; जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
दरम्यान, हे प्रकरण बाहेर आल्यानंतर तत्कालिन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, पंकजा मुंडेंवर आरोप करत, “आमच्या बहिणीने तर लहान मुलांच्या चिक्कीचे पैसे खाल्ले,” असा घणाघाती आरोप केला होता. दरम्यान, मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे आता या याचिकेवर सुनावणी सुरु आहे.
Read Also :
- औरंगजेब आणि चंद्रकांत खैरे या दोघांनी औरंगाबाद शहर खिळखिळ केलं; भाजप आमदाराचा घणाघात
- शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
- मनसेची मोर्चेबांधणी : राज ठाकरे चौथ्यांदा पुणे दौऱ्यावर, २०२२ साठी खास रणनीती!
- ठाकरे सरकार लोकांना अधिककाळ मूर्ख बनवू शकत नाही, हे त्यांचे वेळकाढूपणाचे धोरण आहे
- बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!