मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मोठी टीका केली आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” असे मोठे विधान त्यांनी केले आहे. तसेच, “लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार आहेत. जोपर्यंत देशाच्या लोकसंख्येवर कोणतेही राजकीय पक्ष एकमताने विचार करत नाहीत, तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत,” असं स्पष्टही त्यांनी व्यक्त केलं आहे.
शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
“राज्यात जातीयवाद पहिल्यापासून होता. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. या मुद्द्यावरून निवडणुका लढल्या जातात आणि मतदानही होतं. पण सध्या राज्यात मला असं चित्र दिसत आहे की, लोकांना स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असताना दुसरीकडे समोरच्याच्या जातीबद्दल असणारा द्वेष वाढत चालला आहे. हे चित्र राज्याच्या एकूण संस्कृतीला डाग लावणार चित्र आहे,” असं खंत त्यांनी व्यक्त केली.
राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा – रामदास आठवले
“दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं, हे याआधी महाराष्ट्रात घडत नव्हतं. गेल्या २०-२५ वर्षांपासून या गोष्टींना सुरुवात झाली आहे. हा जातीचा मुद्दा त्या त्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मांनंतर वाढीस लागला,” असं विधान करत, “देशाच्या विकासात ‘लोकसंख्या’ महत्वाचा अडथळा ठरत असून, ती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्याची गरज आहे,” अशी प्रतिक्रया त्यांनी व्यक्त केली.
राज्यात महाविकास आघाडीचा हातात-हात; जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना वाद विकोपाला
“आजही निवडणुकांमध्ये मुद्दे बदललेले नाहीत. प्रचारावेळी चांगले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण देऊ असंच सांगितलं जातं. म्हणेज मग आपण नक्की प्रगती कुठून केली?, प्रगती केली म्हणेज काय केलं?, प्रगतीचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं? याला प्रगती मानत नाहीत. आपली देश म्हणून काही वैचारिक प्रगती झाली का? हे समजून घेणं महत्वाचं आहे,” असं ठाम मत त्यांनी यावेळी मांडलं.
Read Also :
- माजी मंत्री संजय राठोड यांनी महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी; पीडीत महिलेची पोलिसांत तक्रार
- ठाकरे सरकार लोकांना अधिककाळ मूर्ख बनवू शकत नाही, हे त्यांचे वेळकाढूपणाचे धोरण आहे
- बदल्यांसंदर्भात मंत्रालयात थेट सिल्वर ओक वरून कॉल? हॅलो, मी शरद पवार बोलतोय!
- संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, ही लोकशाहीला अशोभनीय घटना; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया
- माझा पराभव त्यांच्यामुळेच…चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक गौप्यस्फोट; केले भाजप केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप