औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर, आज प्रसार माध्यमांसमोर बोलताना गंभीर आरोप केले असून, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी दानवेंनी रुग्णालयात बसून पैशांचं वाटप केलं आणि जावयाला पुढे करून माझा पराभव केला. आता त्यांचा जावई देखील त्यांना शिव्या घालत आहे,” असा धक्कादायक गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे, त्यांनी कराड यांच्यावरही शरसंधान साधले असून, “कराड यांना मीच नगरसेवक केलं, मीच महापौर केलं. त्यांच्यापेक्षा मी खूप मोठा नेता आहे. आमची तुलना होऊ शकत नाही. मराठवाडा हा शिवसेनेचा गड आहे”, असे सांगत, “इथे भाजप कधीच यशस्वी होऊ शकणार नाही,” असा पक्का दावाही केला.
भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी
“शिवसेनेला धक्का देण्यासाठी कराड यांना मंत्रिपद दिलं असेल, तर चांगलंच आहे. ते दिल्याने आमचेही कार्यकर्ते खडबडून जागे होतात, कामाला लागतात. मी दिल्लीत गेलो पण कराडांना भेटलो नाही. माझ्याकडे वेळ नव्हता. तेच मला भेटायला येतील. मला ते त्यांचे नेते मानतात,” असंही ते म्हणाले. त्यामुळे, खैरेंच्या या विधानामुळे आता भाजा-शिवसेना संघर्षात परत एक ठिणगी पडली आहे.
कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार
दरम्यान, खैरेंच्या या विधानाचा कराड यांनी देखील समाचार घेतला असून, त्यांनी ट्विट करत, “तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा, आम जनता के आशीर्वाद और खुद की मेहनत से यहां तक पहुंचा हु, मैं एक निष्ठा से उन का काम करता रहूंगा। मेरे नेता और गुरु गोपीनाथ मुंडे जी का सपना साकार करने के लिए, मैं दिन रात मेहनत करूंगा. आप के अपमान को सहते रहूंगा, पर देश के लिए काम करता रहूंगा। तुम चाहे जितना कीचड़ उछालो, मैं कमल की तरह खिलते रहूंगा,” अशी टीका केली आहे.
Read Also :
- “…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
- “भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
- “आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
- महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
- काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार, मुख्यमंत्री ठाकरेही होणार सामील