सांगली : न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या निकालाला स्थगिती दिल्यानंतर, सत्तेतील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यात आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. या पार्श्वभूमीवर आता संसदेत काल घटनादुरुस्ती विधयेक सादर करण्यात आले आणि बहुतांश मतांनी ते मंजूरही करण्यात आले.
“आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
दरम्यान, यावरून राज्यातील ठाकरे सरकारमधील नेत्यांनी नाराजी दर्शवत भाजपवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. त्यांच्या या टीकेला आता भाजपतील नेत्यांनीही प्रत्युत्तर दिले असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी, ”एकीकडे ओबीसी बांधवावर फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा आणि प्रत्यक्षात मात्र त्यांच्या तोंडाला पाने पुसायची, एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,”अशी टीका मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यावर केली आहे.
महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
तसेच, “लोकसंख्येने सर्वाधिक असणारा आणि तरीही विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाजाचे राज्यातील प्रमाण तब्ब्ल ५२ % आहे. या समाजाला दुय्यम प्रकारची वागणूक देऊन, या सरकारने त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करून घेण्याचं काम केलं आहे,” असा आरोपही त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
“या सरकारने मोठ्या दिमाखात घोषणा केल्या, १० हजार विद्यार्थ्यांना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देऊ, युपीएसीच्या विद्यार्थ्यांना खासगी संस्थेत प्रशिक्षण देऊ, ओबीसींसाठी ७२ वसतिगृह उभारू, गाजावाजा करून महाज्योती संस्थेला १५५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला पण यातील एकही काम त्यांना करता आले नाही. वड्डेटीवारांनी या घोषणांच्या नावाखाली आपल्या तोंडाची फक्त वाफ फक्त दवडली. त्यामुळे, ‘घोषणाबहाद्दर’ वड्डेटीवारांनी राजीनामा द्यावा,” अशी मागणी आक्रमक होत त्यांनी केली आहे.
Read Also :
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
- “मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान