दिल्ली : राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे आता राज्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्या समाजाला यादीत मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पण मराठा आरक्षणासाठी ५० टक्कयांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा यात समावेश नसल्याने विरोधकांनी आणि खासकरून शिवसेनेने नाराजी व्यक्त करत, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
“१२७ व्या घटनादुरुस्तीने सर्व अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करताना, राज्यांना आरक्षण देताना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता केंद्र सरकारने घ्यायला हवी होती. दुर्दैवाने तसं झालेलं नाही. या घटनादुरुस्ती विधेयकात स्पष्टता नाही. त्यामुळे, मराठा आणि धनगर समाजावरचं भाजपचं प्रेम हे ‘पुतना मावशी’चं प्रेम आहे”, असा घणाघात विनायक राऊत यांनी भाजपवर केला आहे. शिवसेना खासदारांनी लोकसभेचं कामकाज स्थगित झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं.
अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
यावेळी, “राज्य सरकारांना ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याची गरज भासली, तर ती केंद्राने राज्य सरकारांना द्यायला हवी होती. कारण राज्यांना मराठा, धनगर, जाट, पटेल, गुर्जर समाज यांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं असल्यास ही मर्यादा ओलांडावी लागणार आहे. तेव्हा या विधेयकाचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे, अनेक शंका त्यातून निर्माण होऊ शकतात”, असं त्यांनी म्हटलं.
मुंबईतील हॉटेल, मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार?, पालकमंत्र्याची महत्वपुर्ण माहिती
तसेच, “भाजपला मराठा-धनगर आरक्षणाबद्दल असेलला कळवळा आणि त्यांनी केलेलं नाटक याचं बिंग संसदेत आज फुटलं आहे. या घटनादुरुस्ती विधेयकात आम्ही ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याची राज्यांना मुभा असावी, अशी दुरुस्ती सुचवली. पण ज्यांना मराठा, धनगर आणि इतर समाजाच्या आरक्षणाचा कळवळा आला होता, त्यांनी या दुरुस्तीला समर्थन न देता विश्वासघात केला आहे. त्यामुळे भाजपने आता कोणत्याही समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
Read Also :
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव
- राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही? नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?
- राज्यात तोंड उघडणारे दानवे-राणे, मराठा आरक्षणावर संसदेत तोंड का उघडत नाहीत? राऊतांचा संतप्त सवाल
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला