दिल्ली : राज्यांना मागासवर्ग निश्चितीचा अधिकार देणारे घटनादुरुस्ती विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. यामुळे आता राज्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास असलेल्या समाजाला यादीत मागासवर्ग यादीत समाविष्ट करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पण मराठा आरक्षणासाठी ५० टक्कयांची मर्यादा शिथिल करण्याच्या तरतुदीचा यात समावेश नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करत, नारायण राणे आणि रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“केंद्राने आरक्षणाचा तिढा कायम ठेवला आहे. आरक्षणाची ५० टटक्क्यांची मर्यादेची अट जोवर उठवली जात नाही, तोवर राज्यांना अधिकार बहाल करून काहीच उपयोग नाही. ही अट उठवली जावी अशी आम्ही राज्यातील सर्व खासदारांनी मागणी केली. पण राज्यातल्या एकाही भाजप खासदाराने यावर तोंड का उघडलं नाही? रावसाहेब दानवे, नारायण राणे यावर काही का बोलले नाहीत?” असा सवाल त्यांनी नाराजीत उपस्थित केला आहे.
“आरक्षणावर बोलण्याची संधी दिली जावी,” छत्रपती संभाजीराजेंची उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी
यावेळी, “संसदेत सादर झालेले दुरुस्ती विधेयक म्हणजे भिजलेला फटाका आहे. राज्यात आत्तापर्यंत लाखों लोकांनी हे आरक्षण मिळावं म्हणून मोर्चे काढले. हा सगळं काय केंद्र सरकारला खेळ वाटतो का? आम्हाला या विधेयकात अडथळा आणायचा नाही म्हणून आम्ही याला समर्थन देतोय. पण सरकारने या सरकारने नागरिकांप्रती संवेदनशीलता दाखवून आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी,” अशी मागणी आक्रमक होत त्यांनी केली.
आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला
दरम्यान, मंगळवारी हे विधेयक पारित होत असताना, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्रकुमार यांनी मंगळवारी या संदर्भांत बोलताना, “आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून, संविधानाच्या दृष्टीने सखोल अभ्यासाची आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत न्यायालयाने ओबीसी यादी तयार करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे सांगितले होते. मात्र त्यात आता दुरुस्ती केली जात आहे. यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाला न्याय देता येईल,” असे सांगत त्यांनी या विधयेकाला पाठिंबा दिला.
Read Also :
- हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
- मुंबईकरांना लोकल प्रवासासाठी अटीही अश्या, की ज्यांची पूर्तता करायलाच येत आहेत नाकी नऊ
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- चोरीच करायचीय तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी करताय? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
- पंतप्रधान आणि अमित शहांची भेट का झाली नाही? चंद्रकांत पाटील यांनी दिले सारवासारवीचे उत्तर