नवी दिल्ली : काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षाबद्दल आपले मत मांडताना, “आम्ही भाजपला हरवायची स्वप्नं पाहत आहोत. आम्ही नक्कीच हरवू, पण सध्या आमच्याकडे पार्ट-टाइम अध्यक्ष नाही. सोनियाजी हंगामी अध्यक्षा आहेत. १२५ वर्षांचा मोठा इतिहास असणारा आमचा राजकीय पक्ष, अध्यक्षांविनाच पुढची वाटचाल कशी करु शकणार आहे?” अशी खंत व्यक्त केली.
हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
“आम्ही काँग्रेस पक्षाच्या चांगल्यासाठीच लढत असून, आम्ही आमचा लढा निर्धाराने सुरु ठेवू. G-२३ ने काँग्रेस पक्षात सुचवलेल्या सुधारणा अजूनही कोअर कमिटीने मान्य केल्या नाहीयेत,” असं सांगताना, “मला ज्या गोष्टीबद्दल सर्वात जास्त वाईट वाटतं, ती ही आहे की; १२५ वर्षांचा मोठा इतिहास असलेल्या पक्षाकडे २ वर्षात पक्षाकडे अध्यक्ष असू नये! अध्यक्षांविना पक्ष पुढे जाणार कसा? मला माहिती नाही. माझं हे मत पक्षाच्या विरोधात नसून पक्षाच्या फायद्यासाठी आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
यावेळी त्यांनी, “शरद पवारांनी ‘महाराष्ट्र मॉडेल’ देशभरात राबवण्याच्या प्रस्ताव दिला असला, तरी ५२३ मतदारसंघांत हे करणं केवळ अशक्य आहे. पण आम्ही निदान ४०० उमेदवार दिले तरी भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही. आम्हाला याच पद्धतीने एकत्र काम करावं लागेल. विरोधकांत मतमतांतर येऊन फूट पडू शकते, पण शेवटी प्रयत्न करायला काय हरकत आहे. आम्हाला देशाचा विनाश करणाऱ्यांपासून देशाला वाचवायचं आहे,” अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
अमित शहांनी टाळली चंद्रकांत पाटलांची भेट, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात अधिकच उधाण
दरम्यान, नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसने सत्ताधारी भाजपला विविध मुद्द्यांवरून खिंडीत गाठलं होतं. मात्र, एक प्रबळ विरोधी पंख म्हणून त्यांची असणारी प्रतिमा, अंतर्गत राजकारण आणि कलहामुळे खालावत चालली असल्याचेही दिसून आले. परिणामी पक्ष सध्या प्रचंड गोंधळाच्या परिस्थितीतून जात असून, याचा परिणाम अगदी काँग्रेसच्या तळागाळातल्या काँग्रेस कार्यकर्त्यावरही होत आहे आणि याची परिणीती येणाऱ्या निवडणुकांत दिसल्याशिवाय राहणार नाही!
Read Also :
- मंत्रालयात सापडलेल्या दारूच्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात; संजय राऊतांनी भाजपला फटकारले
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती
- चोरीच करायचीय तर स्वखर्चाने तरी करा, ती पण जनतेच्या पैशांनी करताय? मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला
- पंतप्रधान आणि अमित शहांची भेट का झाली नाही? चंद्रकांत पाटील यांनी दिले सारवासारवीचे उत्तर
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”