मुंबई : गेले दोन दिवस राज्यातील भाजपचे पहिल्या फळीतील महत्त्वाचे नेते दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांच्यात महत्त्वाच्या बैठका आणि चर्चा होत असून, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना लवकरच वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, भाजपमध्ये देखील या अनुषंगाने मोठा बदल घडण्याचे संकेत दिले जात आहेत.
मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…
दरम्यान, काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी राज्याच्या केंद्रातील सर्व खासदारांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला राज्यातील महत्त्वाचे आमदारही उपस्थित होते. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची स्वतंत्रपणे भेट घेऊन चर्चा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नाही? नवाब मलिकांचं मोठं विधान
यावेळी, भाजप राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनीही अमित शहांची वेळ मागितली होती. पण त्यांनी ती नाकारली असल्याचे समजत असून, भेटण्यासाठी अद्यापही कोणतीही वेळ दिली गेली नाहीये, अशी माहिती सूत्रांची दिली आहे. त्यामळे, काही दिवसांपासून महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणारच्या चर्चा सुरू आहेत. त्यांना हवा मिळाली आहे. दुसरीकडे, राज्य संघटनेतील प्रमुख व्यक्तीला अमित शहांनी भेटण्याचे टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना देखील उधाण आले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना एकाच वाटेवर?
दुसरीकडे, प्रदेशाध्यक्षपदाचा प्रस्तावित बदल, पक्षसंघटनेत व्यापक बदल करण्याबाबत, मनसेबरोबरची घोषित-अघोषित युती, महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने रणनीती, हे मुद्दे या सर्व बैठकांमध्ये केंद्रस्थानी असल्याची खात्रीलायक माहिती सांगितली जात आहे. मात्र असे असले तरी, भाजपत नेमकी कोणती स्थानिक राजकीय खलबते सुरू आहेत? राज्य सरकारविरोधात व्यूहरचना दिल्लीत आखली जातेय का? असे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवले जाऊ लागले आहेत.