मुंबई : ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी, १५ ऑगस्टपासून दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्याची घोषणा केली. तसेच, यासाठी पास उपलब्ध करून देण्यात येणार असून, ज्या नागरिकांकडे पास असेल, त्यांनाच लोकल प्रवास करता येणार आहे, असे सांगितले. त्यामुळे उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्यांना आणि चाकरमान्यांना अखेर प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने दिलासादायक चित्र निर्माण झालेलं असतानाच, आता यातील एक मेख समोर आली आहे.
मोठी बातमी! १५ ऑगस्टपासून लसींचे २ डोस घेतलेल्या सर्वसामान्यांना करता येणार लोकल प्रवास
राज्य सरकारच्या निर्णयानुसार दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. तसेच, दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्यावरच आणि फक्त महिन्याचा पास घेतलेल्या व्यक्तींनाच लोकलमधून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सरसकट सर्वच नागरिकांना महिन्याचा पास काढावा लागणार आहे. राज्य सरकारच्या अश्या किचकट नियमावलीमुळे प्रत्यक्षत लाखो मुंबईकर आणि मुंबईत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळूनही, प्रवासापासून वंचित राहावे लागणार आहे.
मुंबई लोकल प्रवास करायचा आहे! पूर्ण करावी लागणार अजून एक अट
तसेच, मुंबईतील लसीकरणाचा वेगही संथ आहे. अनेक ठिकाणी एक डोस घेतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर देखील प्रशासनाकडून वाढवण्यात आले आहे. त्यामुळे दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या मुळातच कमी आहे. त्यातही ४५ वरच्या नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सर्वात जास्त प्रवास करणाऱ्या १८ ते ४४ या वयोगटाला मिळणारा फायदा फारच कमी असणार आहे.
कसा मिळणार लोकल प्रवासाचा पास? महापौरांनी केली महत्त्वपूर्ण घोषणा!
दुसरीकडे, राज्य सरकारकडून जाहीर लसीकरणाच्या आकडेवारीनुसार, मुंबईत आत्तापर्यंत १६ लाख ४४ हजार ८४० नागरिकांना दुसरा डोस, यापैकी १४ लाख ८१ हजार १९५ नागरिक हे ४५ वर्षांपुढचे, तर मुंबई बाहेरून येणाऱ्या प्रवासी नागरिकांच्या लसीकरणाच्या संख्येतही अशीच मोठी तफावत आहे. त्यातही फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांचीच संख्या अधिक आहे, याचाच अर्थ वास्तवात काही हजार मुंबईकरच राज्य सरकारच्या नियमानुसार प्रवास करू शकणार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
Read Also :
- आघाडी सरकार, तुमची इयत्ता काय? न्यायालयाने सीईटीवरून फाटकारल्यानंतर भाजपने लगावला टोला
- “आरक्षणावर बोलण्याची संधी दिली जावी,” छत्रपती संभाजीराजेंची उपराष्ट्रपतींकडे पत्राद्वारे मागणी
- “पक्षाला अध्यक्ष असेल तरच भाजपला पराभूत करता येईल,” काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने दिला पक्षालाच घरचा आहेर
- हर्षवर्धन आणि विखे पाटलांनी घेतली अमित शहांची भेट, राजकीय पुनर्वसनासाठी ‘गुफ्तगू’ केल्याच्या चर्चा
- प्रदेश भाजपाच्या शिष्टमंडळाचा दिल्ली दौरा राज्याच्या विकासकामांसाठी, चंद्रकांत पाटील यांची माहिती