नवी दिल्ली : राजधानीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळच्या अधिवेशनात, राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने झालेली सर्वात मोठी घडामोड ही मानली जात आहे; की शिवसेना पक्ष आधी नव्हता एवढा काँग्रेसच्या जवळ आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वागण्या-बोलण्यावरून हे चित्र अधिकच स्पष्ट होत आहे.
कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
या पार्श्वभूमीवर आता अजून एक मोठी घडामोड घडत असून, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी २० ऑगस्टला काँग्रेसशासित, तसेच भाजपविरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून, दूर दृश्य प्रणालीद्वारे संपन्न होणाऱ्या या चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील सामील असणार आहेत. त्यामुळे, या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळासोबतच संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
दरम्यान, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून,संसदेचं कामकाज एकही दिवस सुरळीत झालं नाहीये. कालचा दिवसही याला अपवाद नव्हता. काल सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावर चर्चेदरम्यान, विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून त्याचे तुकडे सगळीकडे फेकले. त्यावरुन एकच गदारोळ उडाला आणि राज्यसभेत मार्शलला पाचारण करण्यात आले. यांनतर यावरून विरोधकांनी आक्रमक होत आंदोलनाचा पवित्रा घेतला आणि संसदेपर्यंत मोर्चा काढला.
“मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी, “विरोधकांची एकता मजबूत आहे. २० ऑगस्टला काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यात असणार आहेत. त्या यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती घेणार. तसेच, इतरही मुद्द्यांवर यावेळी चर्चा होणार आहे,” असे सांगितले.
Read Also :
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
- मुंबईतील हॉटेल, मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार?, पालकमंत्र्याची महत्वपुर्ण माहिती
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव