मुंबई : ईडीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी, १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी दिवसेंदिवस आणखीनच वाढत असून, ईडीकडून गेल्या साडेतीन-चार महिन्यांपासून देशमुखांशी आणि कुटुंबियांशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची शहानिशा सुरु आहे. यात काही महत्त्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले असून, त्यामुळे देशमुखांचा पाय आणखीनच खोलात खेचला गेला आहे.
कोरोना निर्बंध आता आणखीन शिथील; या नवीन निर्बंधांची होणार १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
आतापर्यंतच्या ईडीच्या तपासात, देशमुखांनी खासगी बँकांकडून अनेक असुरक्षित कर्जे घेतल्याचे आढळून आले असून, ती मंजूर करताना नियमांचे उल्लंघन केले गेले आहे. तसेच कर्जाचे पैसे कुटुंबातीलच सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वळवण्यात आले आहेत, असा ईडीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. धक्कादायक बाबा ही आहे की कर्जाचे पैसे वर्ग करण्यात आलेल्या कंपन्यांपैकी, अनेक कंपन्यांचे आस्तित्व केवळ कागदावरच आहे.
“मराठा, धनगर समाजाप्रति भाजपाचं प्रेम ‘पुतना मावशी’चं” शिवसेनेनं भाजपावर टीकास्त्र सोडलं
दरम्यान, ईडीने आत्तापर्यंत देशमुख यांना चौकशीसाठी ४ वेळा, तर मुलगा ऋषिकेश आणि पत्नी आरती यांना २ व १ वेळा चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले. मात्र, अद्यापही कोणीही चौकशीला हजर राहिलेले नाही. यावर बोलताना, देशमुखांनी पत्राद्वारे ईडीला सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतरच चौकशीला सामोरे जाऊ, असे सांगितले आहे.
Read Also :
- बेळगाव कारवार सह संयुक्त महाराष्ट्र व्हावाच! अजित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे मागणी
- अशोकराव तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते स्पष्ट सांगा, चंद्रकांत पाटील यांचे आव्हान
- मुंबईतील हॉटेल, मॉल रात्री १० पर्यंत सुरू राहणार?, पालकमंत्र्याची महत्वपुर्ण माहिती
- महाराष्ट्र सदनात आर्थिक घोटाळा प्रकरणी, छगन भुजबळांनी घेतली न्यायालयात धाव
- राहुल गांधी काश्मीरला गेल्यावरच बॉम्बस्फोट, हा त्यांना संपवण्याचा कट तर नाही? नाना पटोलेंचा रोख कुणाकडे?