नवी दिल्ली : सध्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि भाजपत अनेक मुद्द्यावरून खडाजंगी झाली; अजूनही हा वाद शमला नसताना, आता अजून एक नवीन वाद पुढे येत आहे, तो म्हणजे ट्विटरचा. गेल्याच आठवड्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर, ट्विटरने कारवाई केली होती. या यादीत अजून काही काँग्रेस नेत्यांची भर पडली असून, काँग्रेस पक्षाच्या ट्विटर अकाऊंटसह, राज्यातील मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत काँग्रेसच्या ५ बड्या नेत्यांचे अकाऊंट ट्विटरने लॉक केले आहे.
भाजप नेत्याच्या अकलेचे तारे; मोदींची तुलना केली थेट छत्रपती शिवाजीमहाराज आणि राजा शालिवाहन यांच्याशी
काही दिवसांपूर्वी, दिल्लीतील बलात्कार पीडित कुटुंबीयांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर, राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या नोटीशीनंतर ट्विटरने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात, अजय माकन, माणिकम टागोर, जितेंद्र सिंह, सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट कंपनीकडून लॉक करण्यात आलं आहे. ‘मैं भी राहुल’, या फोटोला पाठिंबा दर्शवणारं ट्विट या नेत्यांनी केल्याने त्यांचे अकाऊंट लॉक करण्यात आले आहेत.
कोरोनाकाळात ताटं वाजवल्यामुळेच देशात अवदसा, पंतप्रधांनच सगळ्या मृत्यूंना जबाबदार
या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, “देशातील नागरिकांच्या विचारांची गळचेपी करण्याचं धोरण केंद्राकडून राबवलं जात आहे. ट्विटर ही कंपनी देखील भाजपच्या दाबवाखाली बळी पडून काम करत आहे. काँग्रेस पक्षाकडून आम्ही याचा निषेध करतो. आम्ही हा लढा असाच सुरु ठेऊ,” असं म्हणत, “हम लढेंगे!” असा आक्रमक त्यांनी यावेळी दर्शवला.
“…एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल,” पडळकरांचा वडेट्टीवारांवर जोरदार निशाणा
तसेच, “ट्विटर हे समाज माध्यम असून, त्यावर आपली मते मांडण्याचा संपूर्ण अधिकार नागरिकांना आहे. देशाच्या लोकशाहीतस प्रत्येकालाच आपापल्या पद्धतीने मतं मांडण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने संविधानाने दघालून दिलेल्या बांधतांत राहून आम्ही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न ट्विटरच्या माध्यमातून करत आहोत. पण सध्या लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी सुरू आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Read Also :
- “भिक मागा, भिक मागा भाजपवाले भिक मागा, वकिलांच्या फीसाठी भिक मागा,” पुण्यात शिवसेनेचे आंदोलन
- “आम्हाला वाटले आम्ही हिंदुस्तान-पाकिस्तानच्या सीमेवर आहोत, ही कसली लोकशाही?”
- महापालिका रणधुमाळी: सत्ताधारी भाजपचे कमळ पाण्यात बुडणार? २०२२ वाजणार घड्याळाची टिक-टिक!
- देशमुखांच्या कंपन्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच, ईडीच्या हाती आणखीनही महत्त्वाचे पुरावे
- काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी संवाद साधणार, मुख्यमंत्री ठाकरेही होणार सामील