मुंबई : राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या वादावरून वाकडे आहे. दरम्यान, हा वाद आता कोर्टात असून, आज त्यावरील सुनावणी झाली असता, कोर्टाने या संदर्भातील याचिका निकाली काढली आहे.
“राष्ट्रवादीच्या जन्मांनंतर जातीयवाद वाढीस लागला,”- राज ठाकरे; राष्ट्रवादीकडून दिली गेली प्रतिक्रिया
“राज्यपाल या जागा दीर्घकाळासाठी रिक्त ठेवू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही निरीक्षणे केली आहेत. विशिष्ट कारणांसाठी ही पदे रिक्त ठेवली गेली असतील, तर त्यांची कारणीमिमांसा गरजेची आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे. मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यात समन्वय हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. मात्र ते कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे याबाबतीत कोर्टही त्यांना निर्देश देऊ शकत नाही,” असं त्यांनी नमूद केलं आहे.
परमबीर सिंह यांना दोन प्रकरणात लूक आऊट नोटीस, कोणत्याही क्षणी बेड्या पडण्याची शक्यता
विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्याला जवळपास ९ महिने झाले, तरीही निर्णय होत नसल्याने हा वाद कोर्टात पोहोचला होता. या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण झाली. या संदर्भात राज्य सरकारने पाठवेल्या प्रस्तावाला उत्तर देण्यास राज्यपाल बांधील नाहीत, असा दावा केंद्राने केला आहे. कोर्टापुढे याआधीच १२ सदस्यांच्या नावाला विरोध असणारी याचिका प्रलंबित होती. त्यात ही नवीन याचिका आल्याने, याकडे सर्वांचे लक्ष लागले होती.
The #BombayHighCourt disposes of a PIL challenging the Governor, #BhagatSinghKoshyari's " inaction" in nominating members to Maharashtra's Legislative Council (MLC), despite the 12 names submitted by the Council of Ministers on November 6, 2020. pic.twitter.com/bb0y5JeQXt
— Live Law (@LiveLawIndia) August 13, 2021
12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे.
- एकनाथ खडसे
- राजू शेट्टी
- यशपाल भिंगे
- आनंद शिंदे
- रजनी पाटील
- सचिन सावंत
- सय्यद मुझफ्फर हुसैन
- अनिरूद्ध वनकर
- उर्मिला मातोंडकर
- चंद्रकांत रघुवंशी
- विजय करंजकर
- नितीन पाटील
Read Also :
- मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडवल्या, इथेही वसुली सुरु आहे का? आशिष शेलारांची बोचरी टीका
- रानडे इन्स्टिट्यूट बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव हाणून पाडू; उदय सामंत यांचा इशारा
- शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर; काय म्हणाले नेमकं? वाचा सविस्तर…
- युती सरकारच्या काळात झालेल्या कथित चिक्की वाटप घोटाळा प्रकरणात आला नवा ट्विस्ट
- “संसदेत विरोधकांनी केलेल्या कृतीचे पवार समर्थन करतात का? त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावे’’