मुंबई : सध्या राज्यात असे अनेक महत्वाचे विषय आहेत, ज्यावर अधिवेशनात सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने विरोधी पक्षाने, या वर्षातलं पावसाळी अधिवेशन किमान १४ दिवसांचं असावं, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र, राज्य सरकारने पावसाळी आधिवेशन १४ दिवसांचं न ठेवता, केवळ ५ आणि ६ जुलै, असं दोनच दिवसांचं ठेवलं आहे आणि सरकारच्या या निर्णयावर आता विरोधी पक्षाकडून टीकेची झोड उठवली जात आहे.
हे पण वाचा, “भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही”-नाना पटोले
यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “जेव्हा-जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा महामारी वाढल्याची भूमिका राज्य सरकारकडून घेतली जाते. एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालयाचं उद्घाटन चालतं, मग अधिवेशन का नाही,” असा सवाल विचारून त्यांनी सरकारवर टीका केली. तसेच, यांनतर विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आणि “लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो,” असं फडणवीसांनी सांगितलं.
लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांना पोटात दुखत नाहीतर डोकं दुखतं.तस काहीसं म.वि.आ. सरकारच झालं आहे लोकांचे प्रश्न न सोडवल्या मुळे अधिवेशनच नको.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 23, 2021
हे पण वाचा, शिवसेनेने बांधले घड्याळ, राष्ट्रवादीने उचलला बाण, नव्या युतीचा मुहूर्त ठरला
यातच आता, मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली असून, “लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतं नाहीतर त्यांचं डोकं दुखतं. तसं काहीसं मविआ सरकारचं झालं आहे. लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे त्यांना अधिवेशनच नकोय,” असं खोचक ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.
Read Also :
- काँग्रेस स्वबळावरच लढणार, आम्ही शब्द दिलाय, आता माघार नाही – नाना पटोले
- मुख्यमंत्र्याचा विदेशात काळा पैसा; त्यांच्याच आशिर्वादाने मला अडकवण्याचा डाव, राणा दाम्पत्याने केले आरोप
- ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
- ओबीसींचे राजकीय आरक्षण न मिळाल्यास निवडणुका होऊ देणार नाही; राम शिंदे म्हणतात…
- भाजपाला दे धक्का; महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?