अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काल सर्वोच्च न्यायालायने दिलासा दिला आहे. त्यांच्या रिव्ह्यू याचिकेवर काल सर्वोच्च सुनावणी झाली. यांनतर सर्वोच्च न्यायालयाने, राणांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली असून, तक्रारदारांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे, खासदार नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा दिला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे.
हे पण वाचा, ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
दरम्यान , यांनतर राणा यांनी शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर, तसेच मुख्यमंत्र्यांवर टीका आणि काही आरोप केले असून, “मुख्यमंत्र्यांचा विदेशात काळा पैसा असल्याचे, माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी ईडीला देणार आहे. मुख्यमंत्र्यांची कुठे-किती प्रॉपर्टी आहे, त्याची यादी माझ्याकडे असून, ती मी येणाऱ्या काळात ईडीला देणार,” असा गंभीर आरोप आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
हे पण वाचा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय; पंकजा मुंडे म्हणतात…
तसेच, रवी राणा यांच्या पत्नी, नवनीत राणा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांच्यावर आरोप करत, “मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्याच आशिर्वादाने अडकवण्याचा डाव रचला जात असून, मी एक महिला आहे आणि त्यामुळे माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आता तरी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांनी आपला पराभव एका महिलेने अपक्ष उभं राहून केला आहे, हे पचवायला पाहिजे,” असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
हे पण वाचा, आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण: परिवहन मंत्री अनिल परबांना पोलिसांकडून क्लिन चीट
शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी, खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत, याचिका दाखल केली होती. ‘अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्यामुळे, त्यांनी भारतीय संविधानाचा अपमान तर केला आहेच, पण ज्या मागासवर्गीय मतदारसंघातून त्या निवडणूक लढल्या, त्या सर्व मागासवर्गीयांचाही हा अवमान आहे,’ असं मत व्यक्त त्यांनी आक्षेप घेत व्यक्त केला होता. यांनतर नवनीत राणांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाने निकाल सुनावला होता. यांनतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.
Read Also :
- शिवसेनेत अंतर्गत धुसफूस; भाजपच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळेच, भाजप नेत्याचा दावा
- ओबीसींचे राजकीय आरक्षण न मिळाल्यास निवडणुका होऊ देणार नाही; राम शिंदे म्हणतात…
- भाजपाला दे धक्का; महापौरांसह तब्बल ३९ नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?
- आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठवडाभर संचारबंदीचा प्रस्ताव
- “वडेट्टीवार-पटोले स्वतःला खरे ओबीसी नेते समजत असतील, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे”