मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबत काहीही म्हटलं तरी चालत मग समित ठक्कर त्याच्याबाबत महाविकास आघाडी सरकारची दंडुकेशाही चालू आहे, हे महाराष्ट्राची जनता फार काळ सहन करणार नाही, महाराष्ट्राची जनता आता फक्त निवडणुकीची वाट बघत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री चंद्रकांत यांनी दिली आहे.
समित ठक्कर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर वैयक्तिरित्या टीका केली होती, म्हणून नागपूर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयीन जामीन मिळाला होता पण त्यांना मुंबई पोलिसांनी आणखी एका दुसर्या गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे, या पार्श्वभूमीवर पाटील यांनी वरील टीका सरकारवर केली आहे.
दरम्यान भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाचे प्रकाशन पुणे शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे
“जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन” , असे पाटील म्हणाले आहेत.
Read Also :
चंद्रकांत पाटलांवरील नाराजीने मेधा कुलकर्णी मनसेच्या वाटेवर?
‘मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी नाही’,वारकरी संप्रदायाची भूमिका
जर तुम्ही ‘कोल्हापुरा’तून निवडूनच येणार होता तर पुण्यात येऊन ‘मेधा कुलकर्णीं’ना का डावललं?….
एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांना ‘दे धक्का’ दोनशे ‘महाजन’ समर्थकांचा ‘राष्ट्रवादी प्रवेश’
देवाने कोकणाला अशा मूर्खांपासून वाचवावे, नितेश राणेंची खासदार विनायक राऊत यांच्यावर बोचरी टीका
..मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का पुढाकार घेतला नाही ; राजू शेट्टींची टीका