मुंबई : राज्यातील २३५९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं, त्या सर्व निवडणुकीची आज मतमोजणी सुरू असून आतापर्यंत महायुतीने राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींवर गुलाल उधळला आहे. तर महाविकास आघाडीला अद्यापही शंभरी गाठलेली नाहीय.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी ४११ निवडणुकीपैकी महायुतीच्या ताब्यात २५९ ग्रामपंचायती आल्या असून महाविकास आघाडीच्या खात्यात फक्त ८८ ग्रामपंचायती आल्या आहेत. यामध्ये भाजपला १०१, दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार गट यांच्याकडे ९१, काॅंग्रेसकडे ३२ ठाकरे गट ७९, शरद पवार गट २९ ग्रामपंचायती ताब्यात आल्या आहेत.
दरम्यान, बारामती मतदारसंघात शरद पवार गटाला अजित पवार गटाचा मोठा धक्का बसला आहे. बारामती मधील ७ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाने सत्ता स्थापन केली आहे. पक्ष फुटीनंतर प्रथमच जनतेनं अजित पवारांना भरभरून मतदान केलं आहे.