मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सलग तिसऱ्या दिवशी मराठा समन्वयकांनी अर्धनग्न होऊन निदर्शने आंदोलन केले.पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आम्ही हक्कासाठी आंदोलन करतोय, हा गुन्हा आहे का ? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित करून पोलिस अधिका-यांना कोंडित पकडले. यामुळे आंदोलन गुंडाळण्यासाठी आलेले तीन वाहनातील पोलिस खाली हात परत गेले.
७ ऑगस्ट रोजी एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते हिल्या दिवशी पोलिस आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती. याच पार्शवभूमीवर आंदोलकांनी आज पुन्हा अर्धनग्न आंदोलनाला सुरुवात केली. मात्र आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांच्या मधोमध ठेवला. त्याला काही समन्वयकांनी पकडून ठेवले होते. आमच्या सोबत शिवराय पण येतील. तसेच समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे गुन्हा आहे का? ज्यांच्या मुलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वत:चे आत्मबलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. ते आज आंदोलनात सहभागी झाले आहेत. आमच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. घरात मेल्या पेक्षा रस्त्यावर उतरून मरण पत्करून शहीद होऊ.’ अस इशारा आंदोलनकर्त्यांनि पोलिसांना दिला.
तसेच बळाचा वापर सत्तेचा गैरवापर करून आंदोलन मोडून काढण्याचा कुणी प्रयत्न करू नये. अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला. तसेच पोलिसांच्या सलग आंदोलन मोडून काढण्याचा भुमिकेचा एक मराठा लाख मराठा आणि सरकरचा निषेध आशा घोषणा देऊन तीव्र शब्दांत निषेध केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत व ठोस भूमिका घेतली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.