अमरावती – महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी यशोमती ठाकूर यांना शिक्षा सुनावण्यात आली होती.
अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिस मारहाण प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. यशोमती ठाकूर यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिवसा येथे आंदोलनादरम्यान केली.
यशोमती ठाकूर यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यास काँग्रेस सरकार आपला पाठिंबा काढून घेईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांना वाटत असल्यानेच ते यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेत नाहीत, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला. यशोमती ठाकूर जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत भाजप आंदोलन करत राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. येत्या काळात शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Read also
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात राज्यात स्वाभिमानी आक्रमक
नोव्हेंबरच्या अखेर पर्यंत महाराष्ट्र पूर्णतः सुरू होईल ; विजय वट्टेडीवार