मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतला जर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे केले तरी तिचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कंगनाने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलीच टीका केली होती.
मागील काही दिवसांपासून शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना हा वाद चांगलाच पेटला आहे. कंगना रोज ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर टीकास्त्र सोडत होती मात्र सध्या कंगनाने आपला मोर्चा पुन्हा सिनेसृष्टीतकडे वळवल्याचे पहायला मिळाले होते.
अशातच सरकार स्थापनेला शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी सुद्धा बॉलिवूडच्या या बहुचर्चित ‘क्वीन’वर निशाणा साधला आहे.‘एका अभिनेत्रीमुळं राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शिवसेनाचा वाघ तिथं बसला आहे,’ अस बच्चू कडू म्हणाले.
माध्यमांनीही या अशा अभिनेत्रीला इतकी किंमत देण्याची गरज नाही, जिची कवडिची ही किंमत नाही असा संतप्त सूर त्यांनी आळवला. इतकंच नव्हे तर, कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीला उभे केले, तर तिचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत त्यांनी तिच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत.
Read Also
मराठा आरक्षणाचे नेतृत्व कोणत्या छत्रपतींनी करावे ? देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘हे’ उत्तरhttps://t.co/WnmjlUKabV#Udayanraje #SambhajiRaje #MarathaAarkshan #DevendraFadanvis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 17, 2020