मुंबई : शिवसेनेच्या 40 बंडखोर आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकार स्थापन केले. बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडुन सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यानंतर शिवसेना आणि शिंदें गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले जात आहेत. शिवसेनेतील होणारी फुट रोखण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 15 आमदारांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रावरून मनसे नेते गजानन कळे यांनी ट्विट करत निशाण साधला आहे.
“आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा निष्ठेचा मंत्र तुम्ही जपला”; ठाकरेंचा 16 आमदारांना भावनिक पत्र
जो बूँद से गयी वो ‘पत्र’से नहीं आती..! खंजीर, कोथळा, लाकूड तोड्याची गोष्ट, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्र यानंतर नवाबसेनेच्या पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र ‘… असं खिल्ली उडवणारे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माध्यमांसमोर खुप भावनिक झालेले महाराष्ट्राने पाहिले. यावरून ही मनसे नेत्यांनी शिवसेनेवर अनेक वेळा ट्विट करत निशाण साधला आहे.
“आमच्या घरी आजही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे”; बंडखोर आमदार सदा सरवणकरांचं वक्तव्य
शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. याचबरोबर, शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
“ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका होणार नाहीत”; निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी भारतात 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. याच पाश्वभूमीवर शिवसेना कोणाला पाठिंबा देणार यासाठी शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक होणार आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याबाबत चर्चा करणार असल्याच बोलले जात आहे. तसेच आज वर्षा बंगल्यावर आतापर्यंत फक्त 8 खासदार आले आहेत. तसेच या बैठकीत काय निर्णय घेतात. त्याच्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
- पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
- “यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
- “बंडखोर आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा