वर्धा : काल परवा मोदींनी एका सभेत म्हटले की कॉंग्रेस विकास विरोधी भिंत आहे. थोडं जाणीवपुर्वक पाहिलं तर जाणवलं की त्या विकास विरोधी भिंतीच्या सर्व विटा त्यांच्याच बाजूला बसलेल्या आहेत. ज्या मराठवाड्यातील मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण साहेबांनी विकासाचे दार उघडलं. मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी न्याय दिला. अशोकराव चव्हाण यांनी देखील अनेक विकास कामे केलीत. या तिन्ही मुख्यमंत्र्यांच्या विकास कामांवर पाणी टाकण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. असा घणाघात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलाय.
हेही वाचा…पहाटेचा शपथविधी कसा आणि का झाला ? अजित पवारांचं दमदार पुरंदरमधील दमदार भाषण
महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ काल महाविकास आघाडीची भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेतून जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि महायुतीवर जोरदार टिका केली. पुढे बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, देश भ्रष्टाचार मुक्त करू असे म्हणणाऱ्या पक्षाने देशातील सर्व भ्रष्टाचारी नेते स्वतःच्या पक्षात घेतले. महागाई घालवू असे आश्वासन देऊन सर्व जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढवण्याचे काम त्यांनी केले. आता राज्यभर भाजपच्या विरोधात जनता एकवटू लागली आहे. त्यांना गावागावात प्रचार करणे मुश्किल होऊ लागले आहे. असा दावा देखील त्यांनी केलाय.
यातच शरद पवार यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टिका केली जात आहे. त्याबाबत देखील जयंत पाटील यांनी भाष्य केलं. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब कृषिमंत्री असताना देशात ७२ हजार कोटींची कर्जमाफी झाली. याउलट गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. ते न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या वेशीवर पोहोचले. सुमारे ७०० शेतकऱ्यांचा यात मृत्यू झाला. मात्र मोदी सरकारला दया आली नाही. असा पलटवार देखील पाटलांनी विरोधकांवर केला.
दरम्यान, आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मागे जनमत उभे आहे. आपल्या वयाची पर्वा न करता सुमारे ५५-६० सभा येणाऱ्या काळात घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. एवढा प्रचंड मेहनत करणारा नेता आपले नेतृत्व करत आहे. हा परिवर्तनवादी विचार मजबूत करण्यासाठी अमर काळे यांना बहुमताने विजयी करा. असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितीत जनतेलं केलं.
READ ALSO :
हेही वाचा…“विरोधकांची प्रचाराची वैचारिक पातळी घसरलीय”, सुनील तटकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…आढळरावांच्या प्रचाराला वेग, वाघोली दौऱ्यात लोकांचा उदंड प्रतिसाद
मोठी बातमी…! धाराशिवमध्ये ७७ उमेदवारांनी १७५ खरेदी केले अर्ज
हेही वाचा..अर्चना पाटील की ओमराजे निंबाळकर ? धाराशिवच्या कोणत्या उमेदवारांची संपत्ती जास्त ?