नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांपूर्वी पंजाबच्या दौऱ्यावर होते. मोदींची सभा ज्या ठिकाणी होणार होती त्याठिकाणी भाजपकडून जय्य्त तयारी करण्यात आली होती. पंजाब पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेची खात्री केल्यानंतर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा हुसेनवालाच्या दिशेने निघाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली. हुतात्मा स्मारकापासून ३० किलोमीटर अंतरावरील एका पुलावर वाहनांचा ताफा आल्यानंतर काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचे लक्षात आले.
“खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी..”; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जोरदार टीका
त्यामुळे पंतप्रधानांना सुमारे २० मिनिटे गाडीतच अडकून थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील ही मोठी त्रुटी होती, असेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत गाफीलपणा घडणे म्हणजे अत्यंत निंदनीय आहे असं देखील या घटनेला उद्देशून अनेकांनी म्हटलं होतं.
पोलिसांनाही आता ‘वर्क फॉर्म होम’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
यानंतर शिवसेना नेत्या आणि खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशाचे गृह मंत्रीही तितकेच दोषी असल्याची टीका केली आहे. त्यावर भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही ट्विट करून प्रत्युत्तर दिलं होतं. राम सातपुते यांनी ट्विट करताना म्हटलं होतं की मॅडम पार्टी तो बदली लेकिनी काँग्रेसवाली घटिया और गंदी सौच नही बदली. यानंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट राम सातपुते यांना ब्लॉक करून टाकलं होतं. चतुर्वेदी यांनी ब्लॉक केल्यानंतरही राम सातपुते यांनी ट्विट करत पुन्हा एकदा टोला हाणला आहे. सोनिया सेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मला ब्लॉक केले आहे. इतका राग आरोग्यासाठी चांगला नाही. शुगर आणि ब्लड प्रेशरसारखे आजार होतील,’ असं ट्विट सातपुते यांनी केलं आहे.
Read also:
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत तडजोड होणार नाही; संजय राऊतांचा पंजाब प्रकरणावरून गंभीर इशारा
- पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दलचा गाफीलपणा हा एक सुनियोजित कट; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक आरोप
- “एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय”; पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचं मोठं विधान
- “सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर त्यांनी वर्गणी गोळा केली”
- “पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?”