मुंबई : पंजाबमध्ये जी घटना घडली ती देशात घडलेली सर्वात वाईट घटना आहे. देशात वेगवेगळ्या राज्यमध्ये वेगवेगळी राज्य सरकारे आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळेपण आपल्याला दिसून येईल. देशाचे पंतप्रधान हे देखील भाजप पक्षाचे आहेत. मात्र देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या बाबतीत घडलेली घटना ही यापूर्वी कधीही आपण बघितीली नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल पत्रकार दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींसोबत घडलेल्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
ही घटना एक नियोजित घटना आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. काही एसओपीझ पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल पाळाव्या लागतात आणि या संदर्भात एक कायदा आहे. याची एक पुस्तिका देखील आहे. ही पुस्तिका पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या आधी राज्य सरकारच्या सर्व दलांसोबत विचारविनिमय करून ठरवली जाते. पंतप्रधानाच्या सुरक्षेत कुठे त्रुटी झाल्या याबाबदल आम्हाला माहित नाही असं पंजाब सरकारने म्हणणं योग्य नाही.
मुंबई-पुण्यातील विद्यापीठांचे JNU करायचे आहे काय? आशिष शेलारांचा हल्लाबोल
ऍडव्हान्स पुस्तिका तयार करून झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमस्थळी जाण्याच्या मार्गावर जाणून बुजून आंदोलकांना परगावानगी दिली गेली. मी जाणून बुजून याच्यासाठी म्हणतो आहे कारण आंदोलन करणारे हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. जाणीवपूर्वक त्यांना रोखण्यात आलं नाही. रोड अडवण्याची जाणीवपूर्वक खेळी एक प्रकारे करण्यात आली.
पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तान तिथून जवळचं आहे हे म्हणणं म्हणजे जाणीवपूर्वक मोदींच्या सुरक्षेबद्दल हे सर्व करण्यात आलं. या घटनेचा आम्ही निषेध करतो. राष्ट्रपतींकडे आम्ही याबद्दल तक्रार करणार आहे. पंतप्रधानांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला हे लक्षात आलं पाहिजे आणि काँग्रेसचे नेते ज्या बेशर्मीने पंतप्रधानांच्या सुरक्षेबद्दल वक्तव्य करत आहेत त्याबद्दल देखील मी जाहीर निषेध व्यक्त करतो.
Read also:
- “एवढ्याशा घटनेचा राईचा पर्वत केला जातोय”; पंजाबच्या मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचं मोठं विधान
- “सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावतायेत, आंदोलनाच्या नावावर त्यांनी वर्गणी गोळा केली”
- “पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा हात तर नाही ना?”
- पोलिसांनाही आता ‘वर्क फॉर्म होम’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
- “खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी..”; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जोरदार टीका