मुंबई – पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिली. त्यावरून वादंग निर्माण झालेलं असतानाच पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना?, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नागरिकांना सात दिवसांचे विलिनिकरण सक्तीचे; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांचा दौरा असतो तेव्हा 15 दिवसांपूर्वीपासून सर्व सुरक्षेच्या व्यवस्था पाहिल्या जातात. तीन गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. एसपीजी या सर्वांचं कंट्रोल करत असते. एसपीजी गृहखात्यांतर्गत येते. अमित शहा हे या यंत्रणांचे प्रमुख आहेत. त्यामुळे या घटनेमागे अमित शहांचा हात तर नाही ना हा प्रश्न आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे. असं करून काही डाव तर साधायचा नव्हता ना हेही सांगितलं पाहिजे, अशा शंका पटोले यांनी उपस्थित केल्या.
पण पाच राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी नौटंकी सुरू आहे. भाजप जनतेचे प्रश्न, महागाई बेरोजगारी जनतेचे प्रश्न यावरील विषय डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीने काम करत असते. पंतप्रधान रोज अनेक रुप बदलत असतात. त्या पद्धतीने आजही त्यांनी तेच केलं. पंजाबमध्ये रिकाम्या खुर्च्या होत्या म्हणून नौटंकी सुरू असेल. या प्रकरणी पंजाब सरकारने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू केली आहे. त्यातून दूध का दूध पानी का पानी व्हावं, असंही ते म्हणाले.
२ वर्षे माणसाच्या जीवनातील मोठा कालावधी, आता लॉकडाऊनसाठी नागरिक तयार नाहीत – चंद्रकांत पाटील
मोदींनी शेतकऱ्यांचा विश्वास घात केला. त्याला उत्तर देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं आहे. शेतकऱ्यांना आतंकवादी,. दहशतवादी आणि आंदोलनजीवी ठरवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. त्यामुळे शेतकरी नाराज आहेत, असंही ते म्हणाले. आम्हाला सीरिअसली घेऊ नका. आम्ही शेतकऱ्यांची मुल आहोत. आता शेतकरी आणि मतदार राजा तुम्हाला घरी बसवेल, असंही ते म्हणाले.
Read also:
- पोलिसांनाही आता ‘वर्क फॉर्म होम’, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय
- “खरंतर भाजपने माझ्या घरच्यांची माफी मागायला हवी..”; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर जोरदार टीका
- मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह भाषेत ट्विट; भाजप नेते जितेन गजारीया पोलिसांच्या ताब्यात
- विमानतळ जागेचा वाद पुन्हा पेटणार: भाजपा आमदार महेश लांडगे म्हणतात… विमानतळ खेडमध्येच पाहिजे!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही – देवेंद्र फडणवीस