मुंबई : गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू आहे. राज्य प्रभारी आणि मुंबई काँग्रेस अध्यक्षपदानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर व नाना पटोले यांचे नाव या पदासाठी चर्चेत आहे. मात्र यापदी नाना पटोले यांची निवड जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जाते. याबाबत टिव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणार आहे. यावेळी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे.
याआधी राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला द्यावे, अशी मागणी हायकमांडकडे केली होती. तर नवा प्रदेशाध्यक्ष लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- उद्धव ठाकरे, शरद पवार 25 जानेवारीला शेतकरी आंदोलनात सहभागी होणार
- पहाटेच्या सरकारचे खरे सूत्रधार शरद पवारच – देवेंद्र फडणवीस
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक