मुंबई : महाड इथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यावरून काल दिवसभर राज्यभरात विविध ठिकाणी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांच्यात जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. यानंतर राणे संगमेश्वर इथे असताना त्यांना स्थानिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यांना महाड पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं. त्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
फुग्याला भोक तुमच्या पडलं, आमच्या नाही; चंद्रकांत पाटीलांचा शिवसेनेवर घणाघात
दरम्यान, या सगळ्या तणावपूर्ण घटना-प्रसंगानंतर आज दुपारी ४ वाजता नारायण राणे, त्यांच्या जुहु येथील निवासस्थानी पहिल्यांदाच प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यावेळीते ठाकरे सरकारवर काय हल्लाबोल करणार? त्यांच्या टीकेच्या निशाणावर कोण असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यावेळी ते काही नवे गौप्यस्फोट करणार असल्याची देखील चर्चा दबल्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरु आहे.
काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचा मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली??
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 25, 2021
काल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर, त्यांनी या सगळ्या प्रकरणावर सूचक ट्विट केले आहे. “सत्यमेव जयते,” असं त्यांनी म्हटलं आहे. तर निलेश राणे यांनी, “काल पूर्ण ठाकरे सरकार आणि शिवसेना कामाला लागली, महाराष्ट्रासाठी नाही राणेंसाठी. काल आमचे जे सहकारी व कार्यकर्ते शिवसेनेला भिडले त्यांचे मनापासून आभार. शिवसेनेचे मुख्यमंत्री, मंत्री, कार्यकर्ते पदाधिकारी यांनी टोकाचे प्रयत्न करून सुद्धा आमचं काही उखाडू शकले नाही. औकात कळली?,” असा सवाल केला ट्विट करून केला आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
आसमान में थुंकने वालों, करारा जवाब मिलेगा; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
दुसरीकडे, आजच्या पत्रकार परिषदेत ‘जन आशीर्वाद’ यात्रेचं काय होणार? या प्रश्नाचंही उत्तर मिळणार आहे. कारण, राणेंच्या अटकेनंतर भाजपकडून, ही यात्रा प्रवीण दरेकर, आशिष शेलार यांच्या नेतृत्वात पुढे नेण्यात येईल असं सांगितलं गेलं. परंतु राणेंवरची अटकेची टांगती तलवार रात्री उशिरा दूर झाली. मात्र, असे असले तरी राज्य सरकारकडून आता सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आल्याने राणेंच्या पुढच्या यात्रेचा टप्पा असलेल्या सिंधुदुर्गात यात्रा होणार की नाही? असा सवाल केला जात आहे.
Read Also :
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस
- राणे प्रकरणावर शरद पवारांनी केली, मोजक्या शब्दांत उपरोधिक टीका
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…
- राणेंना जेवण करताना पोलिसांची धक्काबुक्की’, हातातले ताटही ओढले; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप
- राणेंना अटक! आता जन आशीर्वाद यात्रेचं काय? फडणवीसांनी सांगितला ‘प्लॅन’