पुणे : भाजपच्या फुग्याला भोक पडलं आहे, अशी टीका शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केली आहे. शिवसेनेच्या या आरोपावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार केला आहे. फुग्याला भोक तुमच्या पडलं आहे. आमच्या नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा पलटवार केला आहे. ते पुण्यात बोलत होते.
राणे “कोंबडी चोर” अन् ठाकरे “घर कोंबडा”; बॅनरबाजीवरून शिवसेना-भाजपात रंगला कलगीतुरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चूक झाकण्यासाठी भाजप नेते नारायण राणेंचं वक्तव्य लावून धरण्यात आलं. केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं. आमच्या नाही. आम्ही ‘सामना’च्या अग्रलेखाला किंमत देत नाही. राऊतांचं सकाळचं प्रवचन ठरलेलं आहे. राऊत तुमच्यावर एका महिलेने आरोप केले, तिला जेलमध्ये जायला भाग पाडलं. किती हा सत्तेचा दुरुपयोग, अशी टीकाही पाटील यांनी केली.
‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी- फडणवीस
उद्धव ठाकरे चुकले. त्यामुळे मी तिथे असतो तर थोबाडीत मारली असती, असं राणे म्हणाले. थोबाडीत मारण्यासाठी मातोश्रीवर जाणार असं त्यांनी म्हटलं नाही. शोधून थोबाडीत मारणार असंही म्हटले नाही. मुख्यमंत्री असून एवढं कळत नाही का? हा कॉमन संवाद आहे. एक लावून दिली असती असं म्हटलं जातं. पण मीडियाने हे वाक्य लावून धरलं. राणेंची एक भाषा आहे. त्यांची एक शैली आहे, असं त्यांनी सांगितलं.
भाजप कार्यालयावर कोणी चाल करून याल, तर खबरदार! फडणवीसांचा शिवसेनेला इशारा
एकूणच महाराष्ट्रात काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ हा सूडबुद्धीने झाल्याचं सिद्ध झालं आहे. न्यायालयात सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. न्यायालयाने राणेंना पूर्णपणे मोकळीक दिली. जामीन दिला. अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेनंतर टेक्निकल कंडिशन ज्या असतात त्या घातल्या. दोनदा अलिबाग पोलीस ठाण्याला.. पोलीस ठाण्यालाही म्हटलं नाही, जिल्ह्यांच्या एसपींकडे त्यांनी हजेरी लावली पाहिजे. त्यांच्या आवाजाची चाचणी करण्याची पोलिसांना आवश्यकता वाटली तर त्यांना सात दिवसांची नोटीस दिली पाहिजे, या पुढे बोलताना त्यांनी काही गोष्टी सांभाळल्या पाहिजे, असं कोर्टाने म्हटलं आहे. पण यातून सत्याचा विजय झाला हे स्पष्ट झालं. गेल्या 20 महिन्यांपासून सरकारला प्रत्येक विषयात कोर्टाच्या थपडात खाव्या लागल्या. कायद्याचा दुरुपयोग केल्याचंच कोर्टाने प्रत्येकवेळी स्पष्ट केलं आहे, असं ते म्हणाले.
“नारायण राणेंना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करुन शॉक दिला पाहिजे”- गुलाबराव पाटील
भाजप कधीही मनात खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही. रात गई बात गई. राणेंना जामीन झालेला आहे. राणेंची खूप तब्येत बिघडली. जेवताना त्यांच्या हातातील ताट काढून घेण्यात आलं. हे अमानवी होतं. त्यांचं बीपी वाढलं होतं. त्यांना कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही. अडीच तास संगमेश्वर पोलीस ठाण्यात बसून ठेवलं. हे अत्यंत अमानवी झालं. ते एखाद दिवस आराम करतील. शुगर, बीपी नॉर्मल झालं की बहुदा उद्या यात्रा सुरू होईल, असंही त्यांनी सांगितलं.
Read Also :
- फडणवीसांना कायद्याचं चांगलं ज्ञान, पण मी माझ्या आदेशावर ठाम; नाशिक पोलिसांकडून राणेंना नोटीस
- शाब्बास! राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या युवासैनिकांना उद्धव ठाकरेंची शाबासकी
- पोलीस बळ वापरा अन् अटक करा, करावंच लागेल तुम्हाला; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल
- राणे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले…
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वक्तव्यावर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया…