जयपूर : हाफ चड्डी घालून नागपूरमधून खोटी भाषणे देणे म्हणजे राष्ट्रवाद नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. सध्या देशात कृषी कायद्यावरून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून त्यांनी भाजपवर टीका केली.
जयपूर येथे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आयोजित सभेत बोलताना सचिन पायलट म्हणाले की, जर तुम्ही शेतकऱ्याच्या कल्याणाची भाषा करत असाल तर तो खरा राष्ट्रवाद आहे. नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे.
#WATCH | "Talking about the welfare of farmers is what is real nationalism. Nationalism is not delivering phoney speeches from Nagpur wearing half-pants," says Congress leader Sachin Pilot at a rally, in Jaipur, Rajasthan, in support of farmers protesting the new farm laws pic.twitter.com/6jEPKPOIka
— ANI (@ANI) January 3, 2021
आत्ताच्या काळात तुम्ही ‘लव्ह जिहाद’ या विषयावर बोलता. विवाहासंबंधी कायदे करत आहात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहात, अशी जोरदार टीका, अशी जोरदार टीका सचिन पायलट यांनी भाजपवर केली.
इतिहास साक्षी आहे, देशात बहुतेक शेतकरी नेते हे काँग्रेस पक्षाचे होते. तर काही मोजकेच इतर पक्षाचे होते. भाजपामध्ये तर एकही शेतकरी नेता नाही आणि होऊही शकणार नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.