राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. यासंदर्भात चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केले, तर सत्ताधारी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या नेत्यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. मात्र भाजपने उपस्थित केलेले प्रश्न खरे आहेत. राष्ट्रवादी कॅाग्रेसने सत्तेची झाप़डं बाजुला केली तरच त्यांना हे अत्याचार दिसतील, असे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या रोहिणी वानखेडे- नायडू यांनी म्हटले आहे.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महिलांवरील अत्याचाराविषयी इशारा दिला होता. त्याबाबत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी चित्रा वाघ यांना आव्हान दिले होते. यासंदर्भात श्रीमती नायडू यांनी सौ भामरे यांना खडे बोल सुनावले आहेत. त्या म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नेत्यांनी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांना विचारणा केली आहे, की किती ठिकाणी बलात्कार झाले, महिलांवर अत्याचार झाले याची आकडेवारी द्या. मात्र अपराध एक होणं काय किंवा एकापेक्षा अधिक झाले काय अपराध हा अपराध असतो. महिलांच्या संरक्षणासाठी श्रीमती वाघ यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. महिलांच्या सुरक्षितेसाठी काही उपाययोजनांची मागणी केली असेल, तर यात काय चुकले ?
काय म्हणाल्यात नेमकं रोहिणी वानखेडे- नायडू
सौ. नायडू म्हणाल्या, सत्तेत असलेल्यांना कोरोनाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये झालेले बलात्कार, विनयभंग दिसत नाहीत.
अमरावतीमध्ये कोविड-१९ सेंटरला युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्याचा गलीच्छ प्रकार घडलेला आहे. त्याची चर्चा सर्व माध्यमांत झाली. हे त्यांना माहित नाही काय?.
ही म्हणजे कमालचं झाली. सत्ताधारी पक्षांनी डोळ्याला लावलेली सत्तेची झापड बाजूला केली, तरच त्यांना हे सगळ स्पष्ट दिसेल.
इतक्या गंभीर घटना सत्ताधारी पक्षाला दिसत नसतील तर मात्र हा त्यांनी ओढून ताणून आणलेला आंधळेपणा नाही तर काय आहे ?.