पुणे : पैसे कसे खायचे, याचे प्रशिक्षण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मंत्र्यांना देत असते. एका गंजाडी पोरासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. टीव्ही लावला की, हाच विषय दिसतो. एसटी कामगार व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना दिसत नाही. शेतकऱ्यांपेक्षा सरकारला आर्यन खान महत्वाचा वाटत आहे. राज्यात दुसरे विषय नाहीत का, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
अखेर ‘नॉट रिचेबल’ अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; कसून चौकशी होणार?
महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. राज्य सरकारच्या अनेक खात्यात मंत्री भष्ट्राचार करीत आहे. खाते कुठलेही असो खाता आले पाहिजे. राष्ट्रवादीने बिनखात्याचा मंत्री केला तरी तो खाऊ शकतो इतके भारी प्रशिक्षण राष्ट्रवादी त्यांच्या मंत्र्यांना देत असते. राज्यात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर आघाडी सरकारचे लक्ष नाही. कोविड महामारी रोखण्यावर लक्ष नव्हते. शेतकरी व एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर लक्ष नाही. आरोग्य खात्याच्या परीक्षेवर लक्ष नाही, असेही पडळकर म्हणाले.
सहकारी साखर कारखाने यांनीच अडचणीत आणायचे आणि नंतर लिलाव काढून कवडीमोल किमतीने ते विकत घ्यायचे यावर सरकारचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींनी राज्यातील ५५ साखर कारखाने कवडीमोल किमतीने विकत घेतले आहेत. ज्या तालुक्यात मंत्रिपदे नाहीत, तेथील निधी बारामती तालुक्यात वळविला आहे. हा इतर तालुक्यांवर अन्याय आहे. पुरोगामी या गोंडस शब्दाचा वापर करत ही मंडळी राजकारण करत असतात. फुले-शाहू-आंबेडकर यांचे नाव फक्त मतांसाठी घ्यायचे, असा टोलाही त्यांनी पडळकर यांनी लगावला.
Read Also :
- शरद पवारांवरील चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही – संजय राऊत
- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालायं, त्यांचा राजीनामा घ्या – प्रविण दरेकर
- आदित्यजी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांच खरमरीत पत्र
- फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रीया… म्हणाल्या…