मुंबई : महाराष्ट्रात सुरु असलेले असंस्कृत राजकारण थांबले पाहिजे, अन्यथा ही लढाई अत्यंत वाईट मार्गावर जाईल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. माध्यमांशी संवाद साधताना खासदार राऊत म्हणाले महाविकास आघाडीचे राजकीय नेते आणि त्यांच्या नेत्यांना ज्या प्रकारे त्रास दिला जात आहे ते यापुर्वी घडले नव्हते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुसंस्कृत राजकारण केले. त्यांच्यावर होत असलेली चिखलफेक महाराष्ट्र सहन करणार नाही हे विरोधकांनी समजून घ्यावे अन्यथा ही लढाई वाईट मार्गावर जाईल, असेही राऊत यांनी नमूद केले.
ड्रग्स पेडलर आणि भाजपाचं नातं काय? अमृता फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा निशाणा
खासदार राऊत म्हणाले महाराष्ट्रात आता अफू गांजाची शेती पिकतेय का? अशी शंका देशात वाढू लागली आहे. नवाब मलिकांच्या भावना मी समजू शकतो. गेल्या काही महिन्यांत त्यांनी बरच भोगलंय. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. सर्व काही खोटे आरोप केले जात आहे. तपास यंत्रणेचा गैरवापर करुन त्रास दिला जात आहे. राजकीय विरोधकांना अशा प्रकारे संपविण्याचा प्रकार कधीच घडला नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आता शरद पवारांवरही खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. देवेंद्र फडणवीस जर पत्रकार परिषद घेणार असतील तर त्यांनी यावर बोलायला हवं. आम्ही संयम बाळगून आहोत, तो सोडायला लावू नका. नाहीतर ही लढाई अत्यतं वाईट मार्गावर जाईल.
नवाब मालिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, दिवाळीनंतर बाँम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
राजकारणात एकच सांगितले जाते. हमाम मे सब नंगे होते है. जिनके घर शिशे के होते है, वह दुसरो के घरोपर पत्थर नही फेंकते असे म्हणत राऊत यांनी आमच्या देखील हातात दगड असू शकतात अन् तुमच्याही काचा फुटू शकतात. आम्ही अजून संयम बाळगून आहोत. कमरे खालचे वार शिवसेनेने केलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप यांची भेट झाली त्यावर खासदार राऊत म्हणाले हिंदूना सर्व धर्म पवित्र आहेत. ते सर्व धर्मांचं संरक्षण करतात. मोदी तिकडे गेले, त्यांनी पोपला इथं बोलावलंय, त्यांचे स्वागतच आहे.
अखेर ‘नॉट रिचेबल’ अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; कसून चौकशी होणार?
दादरा नगर हवेलीतून उद्या तिथले खासदार मुंबईत विजयी जल्लोष करण्यासाठी येतील याची आम्हांला खात्री आहे असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. नवाब मलिक यांनी आज एक माेठे प्रकरण बाहेर आणले आहे. त्यातील ज्यांच्यावर आराेप केले जाताहेत त्यांनीच उत्तर द्यावे असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालायं, त्यांचा राजीनामा घ्या – प्रविण दरेकर
- आदित्यजी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर तरी डरकाळी फोडा; भाजप नेत्या चित्रा वाघ यांच खरमरीत पत्र
- फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण…; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- नवाब मलिकांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडेची पहिली प्रतिक्रीया… म्हणाल्या…
- फडणवीसांना ‘वानखेडे’ प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न; नवाब मलिकांना परिणाम भोगावे लागणार – चंद्रकांत पाटलांचा इशारा