IMPIMP

‘ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला आहे. महाविकास आघाडीला एकत्र निवडणूक लढवण्याचा फायदा झाल्याचे दिसून येते. भाजपच्या दारूण पराभवावर आता नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना तर भोपळाच असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनाला टोला लगावला आहे.

आपला पराभव मान्य करत नितेश राणेंनी ट्विट केले की, ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा.. मित्र पक्षानीच रचला मृत्यूचा सापळा.. बाकी मैदानात परत भेटूच!

तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर निशाणा साधत ‘तीन पक्षातील केवळ दोघांनाच या निवडणुकीचा फायदा झाला. शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही ही गंभीर बाब असून त्यांनी आता याचं आत्मचिंतन करावे’, असा टोला लगावला.