मुंबई : राज्यात कोरोनाच्या प्रसारामुळे महाविद्यालये उघडण्याबाबत अजून कुठंलाही निर्णय झाला नसल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
यूजीसीने गाईडलाईन दिली आहे, त्याबाबत सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊ”, असं उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले आहेत. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अंतिम वर्ष परीक्षांसह महाविद्यालये कधी सुरु होणार यावर भाष्य केलं आहे. काही विद्यापीठं वगळता जवळजवळ सर्वच विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परीक्षा या यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. तसेच, विद्यापीठांनी निकाल लावण्यास देखील सुरुवात केली असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढल्याचं त्यांनी नमूद केलं.
यानंतर, २०२०-२१ शैक्षणिक वर्षाकरिता महाविद्यालयांचं ऑनलाईन शिक्षण सुरु झालं असून प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु होणार? असा प्रश्न विद्यार्थी-पालक करत आहेत. दिवाळीनंतर शाळा सुरू होणार असल्या तरी कॉलेज बंदच राहणार, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे नेमकं प्रत्यक्ष महाविद्यालये कधी सुरु होणार याबाबत कोणतीही स्पष्टता केलेली नाही.
Read Also :
लपून उत्तर काय उत्तर देता? चर्चेला कुठेही बोलवा, मी तयार, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
केंद्र सरकारच्या कृषी विधेयका विरोधात अमरावतीत काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा
‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात