मुबई : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा हादरा बसलाय. कारण, माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जितिन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. रेल्वेमंत्री पियूष गोयल, भाजप खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत भाजप मुख्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. जितिन प्रसाद यांनी नुकतीच अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत हातात कमळ घेतलं आहे. यावरुन माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी ट्टिवट करत राहुल गांधींवर यांच्यावर निशाणा साधलाय.
राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 9, 2021
“राहुल गांधींच्या सगळे जवळचे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. राहुल गांधींच्या स्वभावाचाचं हा एक भाग आहे, मला सगळं कळतं आणि मीच सर्वात शहाणा हा स्वभाव काँग्रेसला घेऊन डुबला. राहुल गांधी यांनी स्वतः भाजपात प्रवेश करावा हा त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय उरला आहे”, अशा शब्दात निलेश राणे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
कोण आहेत जितिन प्रसाद?
जितिन प्रसाद हे 2009 मध्ये उत्तर प्रदेशच्या धौराहा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. यूपीए-2 सरकारच्या काळात जितिन प्रसाद यांनी पेट्रोलियम आणि रस्ते वाहतूक ही खाती सांभाळली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, आजही उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर परिसरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. एक संयमी आणि विकासाभिमुख नेता म्हणून जितिन प्रसाद यांची ओळख आहे.
Read Also :
- जनतेने दाखवलेल्या विश्वासला ‘तडा’ जाऊ देणार नाही, त्यांचे ऋण फेडण्याचे काम करील – जयंत पाटील
- मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला
- ठाकरे सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल – अतुल भातखळकर
- राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
- मुंबईत पावसाचे थैमान, नागरिकांनो सतर्क रहा; मुख्यमंत्र्यांकडून परिसराची पाहणी