अहमदनगर : मुळा धरणाच्या फुगवट्याच्या पाण्यामुळे राहुरी तालुक्यातील भौगोलिकदृष्ट्या अलग झालेल्या गावांना जोडण्यासाठी पूल बांधण्यात यावा, यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकारात्मक चर्चा झाली. यावेळी माजी खा. प्रसादराव तनपुरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जांभळी, जांभुळबन व वावरथ या तीन गावच्या लोकांना सर्व प्रशासकीय कामासाठी राहुरी या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यासाठी त्यांना बोटी वापर करावा लागतो. यापूर्वी बोटीचा अपघात झाल्याने काही लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आजही लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हा पूल झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील या तीन गावांतील रहिवाशांना दळवळण सुलभ होणार आहे. तसेच पारनेर तालुक्यातील लगतच्या गावांनाही फायदा होणार आहे.
जंयत पाटील म्हणाले की, माझ्यावर जो जननेते जो विश्वास टाकला दाखवला आहे, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. ज्या विश्वासाने विधानसभेमध्ये विश्वास ठेवला आहे, त्यांचे नक्कीच मी ऋण फेडण्याचे काम करील. जनतेच्या हितासाठी, त्यांच्या जीवन आनंदी होण्यासाठी सदैव प्रयत्न करीत राहील. तसेच जांभळी,जांभुळबन व वावरथ हि गावे राहुरीला जोडण्यासाठी प्रत्यक्ष काम झाल्यास राहुरी तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल. हा पुल अस्तित्वात येवून राहुरी तालुक्यातील धरण परिसरातील पुल व डोंगराळ भाग हा विकसित करुन पर्यंटन स्थळ म्हणून प्रसिद्ध होवू शकते. पर्यटन स्थळाचा विकास झाल्यास स्थानिक तरुणांना रोजगाराची साधने उपलब्ध होतील.
Read Also :
- मुंबई महापालिकेनं नाल्यातील गाळाऐवजी नागरिकांच्या करातून माल काढला
- ठाकरे सरकार आता पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल – अतुल भातखळकर
- राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
- मुंबईत पावसाचे थैमान, नागरिकांनो सतर्क रहा; मुख्यमंत्र्यांकडून परिसराची पाहणी
- जायकवाडी कालव्याच्या दुरुस्तीसाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करणार – जयंत पाटील