परभणी : जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर परभणी जिल्ह्यातील ९७,००० हेक्टर क्षेत्र हे लाभलेले आहे. परंतू हा कालवा नादुरूस्त असल्यामुळे पाणी पुर्ण क्षमतेने वाहत नाही. विशेषतः यात परभणी विधानसभा मतदारसंघातील ५०% गावे ही सिंचनापासून वंचित राहत आहे. यामुळे या कालव्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे शिवसेना शिष्टमंडळा कडून करण्यात आली आहे.
यावेळी राज्यमंत्री दत्तामामा भरणे साहेब व शिष्टमंडळात दिनेश बोबडे, रवि पतंगे देशमुख, प्रभाकर जैस्वाल, तानाजी भोसले, अनिल डहाळे, वसिक ईनामदार, बाळासाहेब रसाळ उपस्थित होते.
परभणी जिल्ह्यातील ९७,००० हेक्टर क्षेत्र जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर आहे. जायववाडीचा डावा कालवा नादुरुस्त असल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहत नसल्याने, कालव्याच्या पाण्यावर आधारित शेतकऱ्याला मुबलक पाणी साठा होत नाही. तसेच मतदासंघातील पन्नास गावे ही कालवा नादुस्त असल्याने सिंचनापासून वंचित राहतात. यापन्नास गावाना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे शिवसेना शिष्टमंडळा कडून करण्यात आली आहे. जयंत पाटील म्हणाले, जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यासाठी ६५० कोटीचा आराखडा तयार करु, तसेच वेळप्रसंगी आलाच तर कालव्यासाठी जागतीक बँकेकडून कर्ज घेवून हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
Read Also :
- आगामी महापालिका निवडणुक शिवसेना स्वबळावरच लढणार
- दुसऱ्या पक्षातील दिग्गज नेते शरद पवारांच्या प्रेमात पडलेतं – जयंत पाटील
- मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले
- मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य करणं योग्य नाही – जयंत पाटील
- “उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा”