मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला १० जून रोजी २२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत मुख्यमंत्रीपदाबद्दल विचारले असता “मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य योग्य नाही”, राष्ट्रवादीचा २२ वर्षांचा काळ हा चढउतारांचा होता, महाराष्ट्राच्या राजकारणात
ची नेहमीच महत्वाची भुमिका होती. २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले, मात्र त्यातूनच आर आर पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.
राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची आस्था असणं साहजिक आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील म्हणाले, “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे”, असे त्यांनी सांगितले.
देशात फार कमी लोक आहेत ज्यांना देश चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्यापैकी शरद पवार आहेत. यूपीएतील इतर पक्ष काय विचार करतात हे माहित नाही, मात्र त्यांचा कार्यकर्ता या नात्याने माझी हीच इच्छा आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं. दरम्यान, आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल, मात्र आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे, अशी कमेंट त्यांनी महाविकास आघाडीवर केली, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Read Also :
- “उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा”
- मुंबई तुंबली नागरिकांचे हाल; महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा – शेलारांचा आरोप
- विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं
- काँग्रेसचा एक मोठा नेता आज भाजपात प्रवेश करणार
- शेतकऱ्यांच्या नावावर केंद्र सरकार पेट्रोल- डिझेलमध्ये लूट करतंय – नाना पटोले