मुंबई : शरद पवारांच्या कार्यपद्धतीकडे सर्वच नेते आदराने बघतात, दुसऱ्या पक्षातील नेते सुद्धा शरद पवारांकडे आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात, मात्र कोरोनामुळे अडचणी आल्या आहेत, असं जयंत पाटील म्हणाले. शरद पवार हे केंद्रात दहा वर्ष कृषीमंत्री होते. कृषीमंत्री कसा असावा आणि तो काय काय करु शकतो हे पवारसाहेबांनी दाखवून दिलं, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.
देशात फार कमी लोक आहेत ज्यांना देश चालवण्याचा अनुभव आहे त्यांच्यापैकी शरद पवार आहेत. यूपीएतील इतर पक्ष काय विचार करतात हे माहित नाही, मात्र त्यांचा कार्यकर्ता या नात्याने माझी हीच इच्छा आहे, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.
आमचा मित्रपक्ष काँग्रेस होता, आहे आणि राहिल, मात्र आता एक नवीन मित्रपक्ष मिळाला आहे, भविष्यात देखील तीन पक्षाचे सरकार राहावे, अशी कमेंट त्यांनी महाविकास आघाडीवर केली. भाजपाने अडचणी केल्या म्हणून काही लोक राष्ट्रवादी सोडून गेले, काही दबावापोटी कुणी पक्ष सोडला असेल त्यांनी पक्षात यायला हरकत नाही. आम्हाला बेरजेचे राजकारण करायचे आहे, सोडून गेलेल्याविषयी आम्हाला आकस नाही. हळूहळू सर्वच नेते परत येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या २२ वर्षापासून उठतात. ज्यावेळी राष्ट्रवादी पक्ष वाढायला सुरुवात होते, त्यावेळी काही नतद्रष्ट या वावड्या उठवतात. तसंच पवार साहेबानंतर कोण हे नाव घेऊन पक्षात वितुष्ट निर्माण करायची गरज नाही, असंही ते म्हणाले. राजकारण करणाऱ्यांनी वैयक्तिक भेटीगाठी करु नये ही अपेक्षा चुकीची आहे. मात्र कुणाला कुठलाही निर्णय घेताना, बदलताना संपूर्ण समाजाला विश्वासात घ्यावे लागते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीवर दिली.
Read Also :
- मुंबई कधीच तुंबणार नाही, असा दावा केलाचं नव्हता; महापौर पेडणेकरांनी हात झटकले
- मुख्यमंत्रिपदाबाबत घरात बसून वक्तव्य करणं योग्य नाही – जयंत पाटील
- “उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा”
- मुंबई तुंबली नागरिकांचे हाल; महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा – शेलारांचा आरोप
- विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं