मुंबई : राज्यभर गाजलेली आणि सत्ताधारी-विरोधकांनी प्रतिष्ठेची बनवलेली पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक, भाजपने अचूक प्रकारे चाणक्य रणनीतीचा अवलंब करत जिंकली. यामुळे राज्यात भाजपचे मनोधैर्य कमालीचे उंचावले असून, आगामी काळात महाविकास आघाडीला राज्यात पराभूत करण्यासाठी हाच “पंढरपूर पॅटर्न” राज्यभरात राबविणार असल्याचे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर-मंगळवेढा विधासभा पोटनिवडणुकीमधल्या अशक्यप्राय विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांचे अभिनंदन त्यांनी केले, यावेळी ते बोलत होते.
तसेच, त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. राम सातपुते, विजयराज डोंगरे, जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री सदाभाऊ खोत, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आदी नेत्यांचे देखील त्यांनी कौतुक करत, येणाऱ्या सर्व निवडणुका अशाच एकजुटीने लढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत, तिरंगी लढतीमुळे महाविकास आघाडीला होणारा फायदा लक्षात घेऊन, भाजपने योग्य व्यूव्हरचना आखली आणि भाजपच्या दोन तगड्या उमेदवारांची मन जुळवून हातमिळवणी करून दिली. याचा फायदा असा झाला; की मतविभागणी टळली आणि अशक्यप्राय वाटणारी ही निवडणूक जिंकत सत्ताधारी राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला धक्का देण्यात भाजप यशस्वी झाली.
Read Also :
- मराठा समाजाच्या आरक्षणाची संपूर्ण जबाबदारी आता केंद्र सरकारची ; नाना पटोले
- मराठा आरक्षणासाठी नवी रणनीती, आता मुख्यमंत्री गाठणार थेट दिल्ली
- “राम राज्य”चे गाजर दाखवणाऱ्यांनी, देशाला रामभरोसे सोडून दिले
- उजनीचे पाणी पेटले : “आमचं पाणी चोरलंय; पालकमंत्री भरणे हे चोर, उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत”
- एकनाथ खडसे आणि नितीन गडकरींचे झाले एकमत…