पुणे : बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घातल्याचा आरोप करत पुण्यात स्थानिक नागरिकांनी आंबील ओढ्यातील घरांच्या तोडफोडीला मोठा विरोध केला आहे. आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्यानंतर तेथील नागरिकांनी प्रशासनासमोर गयावया केली. पण प्रशासनाने कुणाचीही बाजू न ऐकता आपली कारवाई सुरुच ठेवली. याचदरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी कशी कारवाई केली, याची माहिती देताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. बोलता बोलता तो धायमोकलून रडायला लागला.
हे पण वाचा, पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
“आमची घरं तोडण्याचं काम सुरु आहे. आमच्या माणसांना पोलिस मारतायत. आम्ही कुठे जायचं…. जी माणसं आमची बाजू पोलिसांसमोर-अधिकाऱ्यांसमोर मांडत होती… त्या माणसांना पोलिसांनी मारलंय.. त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेलेत… अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचं नेमकं… असा आर्त सवाल चिमुकल्याने विचारला.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
“ज्यावेळी कारवाईला सुरुवात झाली, त्यावेशी आमचे फडके काका म्हणून आहेत त्यांचा बीपी वाढला… त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलंय… आमच्या इथली लोकं कुणी दत्तनगरला गेलंय… कुणी चंदननगरला गेलंय… माझे सगळे मित्र इथून गेलेत. आता इथं कुणीच नाही… खाली जाऊन बघितलं की सगळी घरं तोडलीत… आम्ही आता जायचं कुठं? असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल चिमुकल्याने प्रशासनाला केला.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
तसेच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
Read Also :
- आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका