पुणे : पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. यामुळे आंबिल ओढ्यालगत असलेल्या घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. या कारवाईला नागरिकांचा कडाडून विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी अनेकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्याचत आता विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल सुरू झाल्याने सत्ताधारी भाजप टीकेचा धणी ठरला आहे.
हे पण वाचा, पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण पुणे महापालिका प्रशासनावर चांगल्याच तापल्या आहेत. ओढ्यातील अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वी हटवणे गरजेचे असताना त्यावेळी झोपा काढल्या आणि आता ऐन पावसाळ्यात आणि कोरोना असताना कारवाई करून नागरिकांना रस्त्यावर आणले. याला सर्वस्वी पुणे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजप जबाबदार आहे. पुणेकर याचा जाब त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने थेट पाडकामाला सुरुवात केली, असा आरोप स्थानिकांचा आहे. तर आधी नोटीस देऊनच ही कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात अशा प्रकारची कारवाई नियमानुसार आहे का असा प्रश्न आता विचारला जात आहे. परंतू, या कारवाईशी आमचा काही एक संबंध नाही, असे म्हणत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सर्रासपणे हात झटकले आहेत. त्यामुळे विरोधक चांगलेच संतापले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला गेला. सध्या आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
तसेच भाडोत्री कामगार आणून लोकांच्या घरातील साहित्य बाहेर काढलं. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांना उचलून नेलं आणि पाडकाम सुरु आहे. सध्या राजकीय नेते या कारवाईचा निषेध करत असले तरी राजकीय आदेशाशिवाय ही कारवाई होत नाही, हेच सत्य आहे असे स्थानिक नागरिक म्हणणे आहे.
Read Also :
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका
- भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा