उस्मानाबाद : “आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, आता त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही. राज्यतल्या निवडणुकांना अजून ३ वर्षे बाकी आहेत, त्यामुळे या दरम्यानच्या काळात पक्ष वाढवण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले, तर त्यात गैर काय?” असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जळगाव दौऱ्यावर असताना, पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला.
हे पण वाचा, बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
यावर आता, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टिपण्णी केली असून, “राष्ट्रवादीने अजूनही स्वबळाची भाषा केली नाही आणि चाचपणी देखील सुरु केलेली नाही. पण, काँग्रेस स्वबळाचा आग्रह धरत असेल, तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढण्याचा विचार करेल. परंतु, काँग्रेसचा हा स्वबळाचा आग्रह अखेरपर्यंत टिकेल, असं मला वाटत नाही. काँग्रेसला आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करु,” अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे नाना पटोलेंना टोला लगावला आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
जयंत पाटील आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी, “भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मात्र, सध्या महामारीचा काळ असल्याने पक्षप्रवेश रखडले आहेत. मात्र, मंदिर उघडल्यावर पक्ष प्रवेशाचा मुहूर्त सापडेल. अनेक कार्यकर्ते आणि नगरसेवक, तसेच पदाधिकारी जे पक्ष सोडून गेले आहेत, ते स्वगृही परतण्यास उत्सुक आहेत, पण यावर स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद करूनच निर्णय घेण्यात येईल आणि टप्याटप्याने प्रवेश दिला जाईल”, असं पाटील यांनी स्पष्ट केलं
हे पण वाचा, नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
तसंच, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असून, त्याद्वारे अनेकांना त्रास दिला जात आहे. इन्कम टॅक्स, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर राजकीय दबाव टाकण्यासाठी केला जात आहे, हे तर आता सर्वश्रुत आहे. याचाच प्रत्यय प्रताप सरनाईकांच्या पत्रातून देखील येतो,” असं म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी तुळजापुरात देवीचं दर्शन घेतलं. तसेच, राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला तुळजाभवानीचं दर्शन घेऊन सुरुवात झाली. यावेळी, मंत्री धनंजय मुंडे, नेते संजय बनसोडे उपस्थितीत होते.
Read Also :
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका
- भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा
- उद्धव ठाकरे आणि माझ्यात सगळं काही अलबेल; जितेंद्र आव्हाडाचा खुलासा