मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत, तर महाविकास आघाडीत सातत्याने अश्या काही घटना आणि नेते अशी काही विधाने करत आहेत, की त्यामुळे आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात झडत आहेत. तसेच, नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणालाही आत्तापासूनच सुरुवात झाली असून, एकंदरीत सर्वच प्रादेशिक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केल्याचे दिसत आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
दरम्यान, या सर्वात आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेस असून, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांपासून अगदी तळागाळातला कार्यकर्तादेखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झालेला आहे. अनेक नेत्यांचे पक्षात पक्षप्रवेश होत असून, कापूस पणन महासंघाचे संचालक आणि जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी, काल त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
हे पण वाचा, भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा
त्यामुळे, प्रसेनजीत पाटील यांच्या पक्षप्रवेशाने, राष्ट्रवादीला विदर्भात अधिक बळकटी मिळाली असून, येणाऱ्या सगळ्या निवडणुकीत, राष्ट्रवादीचाच झेंडा फडकला पाहीजे, या जोमाने राष्ट्रवादीने काम करायला सुरुवात केली असल्याचेच यातून पाहायला मिळत आह. दरम्यान, पाटील यांच्या प्रवेशानंतर आता, पक्ष त्यांच्यावर काय जबाबदारी देणार, हे येत्या काही काळात स्पष्ट होईल.
हे पण वाचा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूका पुढे ढकलल्या जाणार; आघाडी सरकारचा निर्णय
यावेळी, प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने, बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच, प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे, दांडगा जनसंपर्क असलेल्या पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे, बुलढाण्यातील राजकीय समीकरणे बदलतील अशी शक्यता आहे.
Read Also :
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!
- नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
- उद्धव ठाकरे आणि माझ्यात सगळं काही अलबेल; जितेंद्र आव्हाडाचा खुलासा
- महाराष्ट्र सरकारच्या स्थिरतेबाबत पवारांच्या मनात शंका नाही, पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचं ट्वीट
- आघाडीत बिघाडी होण्याआधीच मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय, आव्हाड म्हणाले आनंद आहे!