मुंबई : सध्या नवी मुंबई विमानतळाला, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की लोकनेते दि.बा. पाटील यांचं नाव द्यायच्यावरून वाद सुरु आहे. यातच आता, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील महाविकास आघाडी सरकारकडे एक मागणी केली असून, त्यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.
हे पण वाचा, भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; आरक्षण आणि अधिवेशनाबाबत होणार चर्चा
या पत्रात त्यांनी म्हटलं आहे, “चिखलदऱ्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र, त्यासाठी याठिकाणी काम चालू केलेला, सिंगल केबलचा स्कायवॉक अर्धवट स्थितीत आहे. आदित्यजी तुम्ही पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणामध्ये तुम्ही ज्याप्रकारे विकासकामांना गती देत आहात, ज्या प्रकारे तुम्ही तिथल्या कामांसाठी पुढाकार घेत आहात, त्याचप्रमाणे जरा विदर्भाकडेही लक्ष द्या,” असं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
हे पण वाचा, उद्धव ठाकरे आणि माझ्यात सगळं काही अलबेल; जितेंद्र आव्हाडाचा खुलासा
तसेच, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव समृद्ध महामार्गाला दिलं आणि आता त्याचं काम जलदगतीने केलं जात आहे. हवंतर, चिखलदऱ्याच्या या प्रकल्पालाही बाळासाहेबांचच नाव द्या, आमची त्याला हरकत नाही, पण या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण करा,” अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे आदित्य ठाकरेंना केली आहे.
हे पण वाचा, राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध; दुकानांच्या वेळामध्ये होणार बद्दल
“स्कायवॉक प्रकल्पाचं काम पूर्ण झालं, तर चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासासाठी तो एक महत्वाचा टर्निंग पॉईट ठरू शकतो. आदित्यजी ठाकरे यांनी लवकारात लवकर या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं, तर आदिवासी महूळ बेळघाट, चिखलदऱ्याला न्याय, तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगारीची चांगली संधी मिळेल, असं देखील नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
Read Also :
- आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
- नवी मुंबई विमानतळाला नाव कोणाचं द्यायचं? आंदोलकांचा आज सिडकोला घेराव
- पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
- तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ; माजी मंत्री संजय कुटे म्हणतात…
- केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका