कोल्हापुर : कोल्हापुरच्या काही शिवसैनिकांनी स्वत: च्या रक्ताने पत्र लिहून उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्यामुळे यांचा सत्कार शिवसेनेचे नेते आणि कोल्हापुरचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांनी त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार आणि उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला याबाबत भाष्य केलं. त्याचबरोबर आमचे शिवसैनिक पळून जाणारे नाही तर थांबून दगड मारले असते असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.
“मुख्यमंत्री रात्री दोन वाजेपर्यंत जागतात, प्रवास करतात, थोडा वेळ तरी थांबा”
मुंबईसाठी महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकलेला नाही. परंतु गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राची लक्तरे काही जण काढत आहेत. महाराष्ट्रात असे अनेक लाखो शिवसैनिक आहेत की ते शिवसैनिक मरे पर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे काही जण खासदार, आमदार झालेत, ते फक्त पैसासाठी वेगळ्या गटात गेले. यांच्यामध्ये तुलना जरी केली तरी यांना काही मोल नाही, असंही ते म्हणाले.
“स्वत:वर 307 केस पडली तेव्हा यांची कडी पातळ झाली”; राऊतांवर नितेश राणेंचा प्रहार
आज जे शिवसेनेतून बाहेर गेले आहेत. त्यांच्या कपाळावर जो गद्दारीचा शिक्का बसला आहे. तो कोणत्याही पैशाने पुसणार नाही. आज आदित्य ठाकरे यांच्या सभांमध्ये तरूणांची मोठी गर्दी जमत आहे. महाराष्ट्रातील जनता आता पेटून उठली आहे. ज्यांनी शिवसेनेविरोधात बंड केलं आहे. अशा विश्वासघातकी माणसांना बाहेर काढण्यासाठी आज सज्ज झाले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या सभेला गर्दी पाहुन यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उदय सामंत यांच्या जो गाडीवर हल्ला झाला आहे. हे त्यांनी स्वत: नाटक करून घेतला आहे. असंही देखील ते म्हणाले.
मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही; काॅंग्रेसचा उद्या जेलभरो आंदोलन
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना कुठंतरी खिळ बसली पाहिजे. त्यामुळे स्वत: च आपल्या गाडीवर दगड मारून घ्यायची. बंडखोर आमदार ज्या पद्धतीने पाठ दाखवून गुवाहाटीला पळून गेले , तसे आमचे शिवसैनिक पाठ दाखवून पळून जाणार नाही. शिवसैनिक थांबून दगड मारून त्यांना ठोकलं असतं. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला हा शिवसैनिकांनी केला नसून त्यांच्याच माणसांनी केला आहे. असं देखील संजय पवार यांनी म्हटलं आहे.
Read also
- फडणवीसांचा दिल्ली दौरा, मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी नाही, अंतर्गत कलह अटळ
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
- संजय राऊतांसोबत त्यांच्या पत्नीची देखील चौकशी होणार; इडीकडून समन्स, तर राऊतांची कोठडी वाढविली
- “मंत्रिमंडळ विस्तार प्रश्न गरजेचा नाही, पण शिवसेना प्रहारमध्ये विलीन करू नका”
- “मविआ सरकारचे निर्णय का बदलले? कोर्टात तरी खरं सांगा”; राष्ट्रवादीचा शिंदेंना सवाल