चेन्नई : आत्तापर्यंत देशात महामारीने अनेक नागरिकांचे जीव घेतले आहेत. मात्र, सध्याच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला असून, महामारीसोबतच वेळेवर उपचार, तसेच ऑक्सिजन न मिळाल्याने देखील महामारीने बाधित अनेक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, यातच प्राणवायूचा विविध क्षेत्रात कशाप्रकारे उपयोग करता येऊ शकतो, याबाबतचे संशोधन करत असणाऱ्या मराठमोळ्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना समोर येत असून, त्यांच्या निधनाने प्रचंड हालहाल समाज माध्यमांवर व्यक्त केली जात आहे.
डॉ. भालचंद्र काकडे असं या मराठमोळ्या तरुण संशोधकांचं नाव असून, वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांचं चेन्नईत निधन झालं. ते मूळचे महाराष्ट्रातील कोल्हापूरचे आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी महामारीची लागण झाली होती. त्यानंतर प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे त्यांना त्वरित चेन्नईच्या सरकारी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
त्यांच्यावर दोन दिवस उपचार झाले. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना, अचानक मंगळवारी रात्री उशिरा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तिथे उपचार घेत असलेल्या १० जणांचा प्राणवायू अभावी दुर्दैवाने मृत्यू झाला. यामध्ये डॉ. काकडे यांचाही समावेश होता.
डॉ. भालचंद्र काकडे यांनी रसायनशास्त्र विषयात, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा वापर त्यांचा विविध क्षेत्रात काय उपयोग करता येईल यावर संशोधन सुरु केलं. जपानच्या टोकियो इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये देखील ते अल्पावधीसाठी कार्यरत होते. नंतर ते चेन्नईच्या एसआरएम संशोधन संस्थेमध्ये वरीष्ठ संशोधक म्हणून रुजू झाले. त्यांच्या अल्पावधीच्या आयुष्यात त्यांनी आपल्या संशोधनाच्या जोरावर ७ पेटंट नावावर केले आहेत.
Read Also
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- पुण्यात उभारलं जाणार देशातलं पहिलं ‘चाईल्ड कोविड सेंटर; महापालिकेचा निर्णय
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण
- ‘एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी’
- ‘मुझे तो माँ गंगा ने बुलाया हैं’ म्हणत बनारसमधील नागरिकाच्या भावनांशी खेळणारे पंतप्रधान आज…