मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत (एनआयए) आहे. यात आत्तापर्यंत मुख्य संशयित सचिन वाझे यांच्यासह निलंबित पोलीस अधिकारी सुनील माने, रियाज काझी, निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे, बुकी नरेश गोरे यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, वसई-विरारमधील व्यावसायिक मयुरेश राऊत यांनी, मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटामध्ये, आपल्या चोरीला गेलेल्या २ गाड्यांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला असून, यासंदर्भात त्यांनी एनआयएकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांचा जबाब देखील आता एनआयएने नोंदवून घेतला असल्याने, या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे माझ्या जीवाला देखील धोका आहे. मनसुख हिरेन त्यांचा जवळचा मित्र असूनही त्याची हत्या झाली. माझा आणि त्यांचा तर दूरदूरपर्यंत संबंध नाही. मला धमक्यांचे अनेक फोन येत आहेत. हे लोकं जर अँटिलियाबाहेर बॉम्ब ठेऊ शकतात, तर माझी हत्या करणं फार छोटी गोष्ट आहे”, अशी भीती व्यक्त केली आहे.
मयुरेश यांच्या २०१८ मध्ये दोन गाड्या चोरीला गेल्या होत्या. त्या अजून गायब आहेत. मनसुख हिरेन प्रकारानंतर त्यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांना हिरेन यांच्या हत्येच्या कटात आपल्या चोरीला गेलेल्या गाड्यांचा वापर झाल्याचा संशय आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांची नावं घेतली आहेत.
दुसरीकडे, “या प्रकरणात दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन एनआयएने दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच याबाबतीत अद्यापही एफआयआर नोंदवली गेली नसून, सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी विरार पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत”, अशी मागणी मयुरेश राऊत यांनी केली आहे.
Read More :
- ‘नितीन गडकरींकडे सुत्रे देण्यामागच्या मागणीची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या’
- ‘एसटीच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी’
- ‘मुझे तो माँ गंगा ने बुलाया हैं’ म्हणत बनारसमधील नागरिकाच्या भावनांशी खेळणारे पंतप्रधान आज…
- धंदेबाज लोकांनी स्वतःचे धंदे बघावे, आमचं आम्ही बघू; मलिकांचा काकडेंवर निशाणा
- प्रत्यक्षात स्थिती नियंत्रणात, मात्र कोर्टातली आकडेवारी वेगळी; पुणे महापौरांचा गंभीर आरोप