मुंबई : आमचे सरकार असते तर चिन्यांना १५ मिनिटांत उचलून बाहेर फेकले असते असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलायला हवे. त्यांच्याकडे चीनशी लढण्याची कोणती योजना आहे याची माहिती घ्यायला हवी, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून राहुल यांची पाठराखण केली आहे. ‘राहुल गांधी यांच्याकडे काही योजना असेल तर मोदींनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. राहुल यांचे म्हणणे कुणाला बकवास वाटत असेल तर त्यांनी मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून पाहायला हवीत.
पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर खेचून आणण्याची भाषा कोणी केली होती ? काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ करण्याचे वचन कोणी दिले होते. त्या वचनांचे आता काय झाले हे स्पष्ट व्हायला हवे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
चीननं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अलीकडेच मोदी सरकारवर टीका केली होती. चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसूनही पंतप्रधान इतके थंड कसे ?,असा प्रश्न राहुल यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली होती.
सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारवर हल्ले करण्यासाठी ८० हजार बनावट सोशल अकाऊंट्स उघडण्यात आली. त्यातील बहुसंख्य अकाऊंट्स नेपाळ, टर्की, सिंगापूरसह बाहेरच्या देशातून चालवण्यात आली. जे सरकार देशांतर्गत विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
Read Also
सरकारला ‘अमर अकबर अँथनी’ म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंना राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसकडूनही टोलाhttps://t.co/vpfCLGPhYb#RaosahebDanave #MahavikasAaghadi #Congress #NCP #Shivsena@sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 8, 2020